Akola News: गेल्या काही दिवसांत पश्चिम विदर्भात झालेल्या अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले असले, तरी जलसाठ्याच्या दृष्टीने मात्र हा पाऊस वरदान ठरला आहे. अकोला, वाशीम व बुलडाणा जिल्ह्यांतील प्रमुख प्रकल्प जलाशय तब्बल क्षमतेच्या जवळपास भरले आहेत. .यामुळे पुढील रब्बी हंगाम तसेच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न काही प्रमाणात सुटणार असल्याचा दिलासा नागरिकांना मिळाला आहे.या भागात गेले चार दिवस संततधार पाऊस झाला. मुख्यत्वे हा पाऊस प्रकल्पांच्या क्षेत्रात झाल्याने त्याचा फायदा झाला..Dam Water Storage: राज्यातील एकूण पाणीसाठा ८०% च्या जवळ; उजनी, राधानगरी १००% भरले.धरणांमधील साठे वेगाने वाढले.निर्गुणासारखा पातूर तालुक्यातील प्रकल्प ओसंडून वाहिल्याने या नदी काठावरील शेतशिवारात नुकसान झाले. काटेपूर्णा प्रकल्पातून विसर्ग .अकोला जिल्ह्यातील महत्त्वाचा काटेपूर्णा प्रकल्प ८५.८७ टक्के क्षमतेने भरल्याने १० वक्रद्वार उघडून विसर्ग करण्यात आला. वाढलेल्या जलसाठ्यामुळे नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाणी सोडल्याने काटेपूर्णा नदीच्या काठावरील गावांना दक्षतेचा इशारा देण्यात आला होता. दुसरीकडे सातपुड्याच्या पायथ्याशी असलेला वान प्रकल्पही ७१.०२ टक्के भरला आहे. २४ तासात या प्रकल्पा सुमारे ९ टक्के साठा वाढला. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.