Jalna News : घनसावंगी तालुक्यात पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे तालुक्यातील लाखो हेक्टर क्षेत्रावरील खरीप पिके पाण्याखाली गेली आहेत. हातातोंडाशी आलेली पिके डोळ्यांदेखत वाहून जात असल्यामुळे शेतकरी हताश झाले आहेत. त्यामुळे शासनाने तत्काळ पंचनामा करून भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे..Rain Crop Damage : पावणेतीन लाख हेक्टर पिकांना अतिवृष्टीचा फटका.गेल्या तीन वर्षांपासून पावसाळ्यात अतिवृष्टी व महापुरामुळे शेतकरी हताश झालेले आहेत. तालुक्यातील शेतकरी कधी अवर्षणामुळे, तर कधी अतिवृष्टीमुळे आर्थिक कोंडीत सापडलेला आहे. यंदा मॉन्सूनपूर्व पाऊस झाला तो आजपर्यंत कायम आहे. मध्यंतरी पेरणीच्या कालावधीत पावसाने खंड दिला होता. मात्र, त्यानंतर आहे ती परिस्थिती कायम पावसाची राहिली आहे..Rain Crop Damage : अतिवृष्टीने हिरावला शेतकऱ्यांच्या तोंडचा घास.सध्या परिस्थितीत कापूस, सोयाबीन ही पिके ही जोमात आली आहेत. फुले, फळेही लागली. मात्र, यंदा शेतीचे उत्पादन चांगले होईल असे म्हणत असतानाच ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून सर्वदूर मोठ्या प्रमाणात पाऊस होत आहे..त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचून पिकांची वाढ खुंटून पिवळे पडणे आणि कुजण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकरी वर्गातून होत आहे..तालुक्यात मूग, सोयाबीन, कापूस या पिकांची पेरणी मोठ्या प्रमाणात झालेली आहे. मात्र, सततच्या पावसामुळे पिकांची वाढ खुंटलेली आहे. पिके पिवळी पडून कुजून जात आहेत. उर्वरित पिकांना फुले, फळे अत्यंत कमी प्रमाणात लागल्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात यंदा मोठ्या प्रमाणात तूट होणार आहे. याकरिता शासनाने शेतकऱ्यांना भरीव आर्थिक मदत करावी.– आत्माराम चव्हाण, शेतकरी पानेवाडी.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.