Dharur News: किल्लेधारूर तालुक्यात मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. काढणीस आलेली खरीप पिके, सोयाबीन, वेचणीस आलेला कापूस या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. .यासोबतच रब्बी हंगामात नुकतेच पेरणी केलेल्या गहू, हरभरा आणि घेवडा या पिकांचेही मोठे नुकसान झाले असून शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचे संकट निर्माण झाले आहे. तालुक्यात ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यांत पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे खरीप पिके हातची गेली होती आणि अनेक भागांतील जमीन खरडून गेली होती..Re-Sowing Crisis : शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट.परिणामी शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले होते. त्यानंतर पावसाच्या एका महिन्याच्या खंडामुळे शेतकऱ्यांनी अतिवृष्टीपासून वाचलेली पिके जसे की सोयाबीन, मूग, उडीद यांची काढणी वेळेत करून रब्बी हंगामासाठी शेतीची तयारी करून पेरणी केली होती..Re-sowing Crisis : वरुणराजाची पाठ, दुबार पेरणीचे संकट.मात्र, मागील दोन दिवसांपासून तालुका परिसरात पुन्हा जोरदार पावसाने हजेरी लावली. एकाच दिवशी ७२ मिमी पावसाची नोंद झाली. अचानक आलेल्या पावसाने शेतकऱ्यांची तारांबळ उडाली. कापसाच्या वाती पाण्यात बुडाल्या, सोयाबीनच्या मुड्यात पाणी गेले, आणि रब्बी पिकांना मोठा फटका बसला. त्यामुळे दुबार पेरणी करावी लागण्याची परिस्थिती निर्माण झाली असून वाण नदीला पूर आल्याने गावांचा काही काळ संपर्क तुटला होता..रब्बीची शेतीची मशागत करून हरभरा आणि घेवडा पेरणी केली आहे. पेरणी करून आठ दिवसांचा कालावधी उलटला असून हरभरा व घेवडा उगवत आहेत, मात्र दोन दिवसांपासून चाललेल्या पावसामुळे ही पिके जागेवरच जिरून जाणार आहेत. पुन्हा एकदा रान तयार करून पेरणी करावी लागणार आहे.- सचिन चाळक, शेतकरी, धारूर.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.