Ahilyanagar News : शेवगाव, पाथर्डी व अन्य भागात दोन दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीने खरिपातील शेत पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्याचा मोठा फटका कापूस, मूग, उडीद, सोयाबीन, बाजरी उत्पादकांना बसला आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शिवसंग्रामचे शेवगाव तालुकाध्यक्ष संदीप बामदळे यांनी केली आहे. .बादमळे यांनी सांगितले, की शेवगाव, पाथर्डी व अन्य भागांत दोन दिवसांपूर्वी अतिवृष्टी झाली. शेवगाव तालुक्यातील हिंगणगाव, जोहरापूर परिसरासह तालुक्यात होणाऱ्या पावसामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. .Crop Damage Survey : पिकांचे पंचनामे पर्जन्यमापकाच्या भरोसे.आधीच शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली दबला असून, एक वर्षापासून शेतकऱ्याला कर्जमाफीची आशा आहे. मात्र तोही निर्णय झालेला नाही. यंदा पिकांची स्थिती चांगली होती. मात्र अतिवृष्टीने मोठे नुकसान केले आहे. त्याचा थेट परिणाम उत्पादनावर होणार आहे..Rain Crop Damage : पावणेतीन लाख हेक्टर पिकांना अतिवृष्टीचा फटका.त्याची शेतकऱ्यांनी धास्ती घेतली आहे. त्यामुळे अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकाचे तरी तत्काळ पंचनामे करावेत, अशी मागणी यांनी पत्रकाद्वारे केली आहे. पत्रकात म्हटले आहे, की या वर्षीच्या खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने कापूस, तूर, उडीद, सोयाबीन, मूग, बाजरी आदी पिकांची पेरणी केली होती. .सुरुवातीला सर्व पिके चांगली आली होती. परंतु सतत होणाऱ्या पावसामुळे सर्वच पिकांची नासाडी होऊन हाता-तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला आहे. प्रशासनाने तत्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी बामदळे यांनी केली आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.