Palghar News : डहाणू, तलासरी तालुक्यात गेल्या दोन दिवसांत मुसळधार पावसाने भातशेतीला झोडपून काढले. चिकू बागायतदार आणि शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत. पोटरीत आलेल्या भातपिकाला धोका निर्माण होण्याची शक्यता जाणवत आहे..दोन दिवसांपासून डहाणू, तलासरी भागात मुसळधार पावसाने थैमान घातले. भातशेतीमध्ये प्रचंड प्रमाणात पाणी साचले आहे. भातशेती अक्षरशः पाण्याखाली गेली असून, शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे. खाचरामध्ये पाणी असल्याने भातशेतीला बुरशीजन्य रोगाची वाढ होण्याची शक्यता आहे..Paddy Crop Damage : वीसगाव खोऱ्यात भात पिकास फटका.पाण्याचा निचरा करावा!कधी मुसळधार, कधी रिमझिम पाऊस, तर कधी ढगाळ वातावरण, तर कधी ऊन या निसर्गाच्या बदलत्या चक्रानुसार भातपिकावर बुरशीजन्य रोगांची शक्यता आहे. .Paddy Crop Damage : चंद्रपुरात धान पिकावर पुराचे संकट.भातपीक फुटव्यांच्या अवस्थेमध्ये खाचरात पाच सेंमीपर्यंतचा पाणीसाठा असणे आवश्यक आहे, परंतु बुरशीजन्य रोगांपासून शेतीला वाचविण्यासाठी कृषितज्ज्ञांच्या मार्गदर्शनाने उपाययोजना कराव्यात, असे सांगण्यात आले. .लागवडीच्या फळझाडांना काठीच्या आधाराने बांधावे. शेतातील अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा.- डॉ. विलास जाधव, प्रमुख, कृषी विज्ञान केंद्र, कोसबाड.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.