Latur News : तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. सोयाबीन, तूर, उडीद, मूग या खरीप पिकांवर मोठा परिणाम झाला असून, शेतकऱ्यांच्या शिवारात पाणी साचल्याने उभे पीक पूर्णपणे खराब झाले आहे. .या पार्श्वभूमीवर विविध गावांमध्ये कृषी विभाग व महसूल प्रशासनामार्फत पंचनाम्याचे काम सुरू असून ७० टक्के क्षेत्राचे पंचनामे झाले आहेत. तालुक्यात ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मुसळधार पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले. .Rain Crop Damage : अतिपावसाच्या तडाख्यात पिके धोक्यात.दोन दिवसात २०० मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस झाल्यामुळे नदी नाल्यातून जोराने पाणी वाहिले. अनेक दिवस पिके पाण्याखाली राहिल्यामुळे हाती आलेल्या पिकांचे नुकसान झाले. ८२ गावांतील ४८ हजार शेतकऱ्यांच्या शेतातील ३४ हजार पाचशे हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले. .Rain Crop Damage: पाऊस सुरूच, उडीद पीक गेले हातचे.प्रशासनाकडून पंचनाम्याचे आदेश देण्यात आल्यानंतर कृषी सहायक, तलाठी व ग्रामसेवक यांच्याकडून शिवारात जाऊन नुकसानीची पाहणी करून पंचनामा केला जात आहे. पंचनाम्याचा अहवाल शासनाकडे पाठवून शेतकऱ्यांना मदत मिळण्यासाठी पुढील कार्यवाही करण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे..तलाठी, कृषी सहायक व ग्रामसेवक यांच्या पथकांकडून गावागावात शेतकऱ्यांचे पंचनामे केले जात आहेत. लवकरच सर्व पंचनामे पूर्ण होतील. याचा अहवाल शासनाकडे पाठवला जाईल. शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे.— नरसिंग जाधव, तहसीलदार चाकूर.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.