Sindhudurg News : सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे १३६ गावांमधील १ हजार १८ शेतकऱ्यांचे १९६ हेक्टरवर भातपिकाचे नुकसान झाले आहे. याशिवाय नाचणी पिकांचे देखील नुकसान होण्यास सुरुवात झाली असून नुकसानीचे क्षेत्र वाढण्याची शक्यता आहे. .जिल्ह्यात ५४ हजार हेक्टरवर भातपीक आणि तीन हजार हेक्टरवर नाचणी पीक लागवड आहे. या वर्षी पावसामुळे भातपीक कापणी रखडली. पहिल्या दुसऱ्या टप्प्यातील भातपिकाचे मोठे नुकसान झाले. पावसाने केवळ तीन ते चारच दिवस उघडीप दिली. त्यामुळे त्यानंतर सतत पावसाची संततधार सुरू आहे. २१ ऑक्टोबरनंतर जिल्ह्यात पावसाचा जोर आणखीनच वाढला..Paddy Crop Damage : भाताच्या कोठारावर अस्मानी संकट .सतत पडत असलेल्या पावसामुळे उभ्या पिकांना कोंब फुटू लागले आहेत तर काही भागातील पिके चिखलाच्या पाण्यात रूतत चालली आहेत. कापणी केलेल्या पिकांचे देखील मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. दरम्यान कृषी विभागाने २१ ते २९ ऑक्टोबर या कालावधीत झालेल्या पीक नुकसानीचे पंचनामे पूर्ण केले आहेत..Paddy Crop Damage : पावसाचा भात पिकाला फटका.भातपिकासोबत नाचणी पिकाचे देखील मोठे नुकसान झाल्याचे दिसून येत आहे. आतापर्यंत १३६ गावांमधील १ हजार १८ शेतकऱ्यांचे १९६ हेक्टरवरील भातपिकाचे नुकसान झाल्याचे कृषी विभागाने शासनाकडे अहवाल पाठविला आहे. नुकसानीचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. नाचणी पीक नुकसान देखील होऊ लागली आहे..जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे भात, नाचणी पिकांचे नुकसान झाले आहे. ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे त्यांनी तातडीने नुकसानीबाबतची माहिती ग्राम महसूल अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी आणि सहायक कृषी अधिकारी यांना द्यावी.- भाग्यश्री नाईक नवरे, जिल्हा कृषी अधीक्षक, सिंधुदुर्ग.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.