Nashik News : सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे निफाड तालुक्यातील मौजे सुकेणे गावात शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. एकट्या सुकेणे गावात जवळपास ३०० हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची संख्या सुमारे ४९२ इतकी आहे. सर्वाधिक फटका सोयाबीन व द्राक्ष पिकांना बसला आहे..शासनाच्या आदेशानुसार ग्राम महसूल अधिकारी अबोल साळवे, सहाय्यक कृषी अधिकारी योगेश निरभवणे, आणि ग्रामपंचायत अधिकारी हेमंत सोनार यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष टीमकडून गावातील शेतीचे पंचनामे सुरू करण्यात आले आहेत. .Rain Crop Damage : सातारा जिल्ह्यात अतिवृष्टीने ४२०४ हेक्टरची हानी.परिसरात एकूण २९७.०५ हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून, यात सर्वाधिक नुकसान सोयाबीन पिकाचे १५७.१८ हेक्टर नुकसान झाले आहे. त्याखालोखाल द्राक्ष पिकाचे ४० हेक्टर, मका ७१.२३ हेक्टर, टोमॅटो ११.७१ हेक्टर, भाजीपाला १३.९३ हेक्टर आणि ऊस ३.०० हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले आहे. .Rain Crop Damage : अतिवृष्टीमुळे ८ हजार ७३९ हेक्टर जमिनीचे नुकसान.अद्याप काही शेतकऱ्यांचे पंचनामे बाकी असल्याने बाधित क्षेत्र आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. परिसरातील पंचनामे पूर्णत्वाकडे असून, शेतकरी वर्गातून शासनाकडून लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे..मौजे सुकेणे गावातील शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन अचूकपणे पीकनिहाय पंचनामा सर्वेक्षण केले आहे. लवकरच शासनाला परिपूर्ण नुकसान भरपाईचा अहवाल पाठविला जाणार आहे. त्यानुसार पुढील कार्यवाही शासनाच्या वतीने होईल.- योगेश निरभवणे, सहाय्यक कृषी अधिकारी.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.