Akola News : जिल्ह्यात १६ ते २९ सप्टेंबरदरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी हवालदिल झाले असून, एकूण १११ गावे बाधित झाली आहेत. प्राथमिक अहवालानुसार तब्बल २९ हजार ३२७ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाल्याचे समोर आले आहे..यात प्रामुख्याने कपाशी, सोयाबीन आणि तूर या पिकांना सर्वाधिक फटका बसला आहे. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनी सादर केलेल्या अहवालानुसार तालुकानिहाय नुकसानीचे तपशील दिले आहेत. शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. .Crop Damage Compensation: तत्काळ पंचनामे करून सरसकट नुकसान भरपाई द्यावी .यात बार्शीटाकळी तालुक्यात १६ गावे बाधित असून कपाशी, सोयाबीन व तूर या पिकाखालील ४८०० हेक्टर क्षेत्राचे नुकसान, अकोट तालुक्यात १८ गावे बाधित झालेली असून २४८१ हेक्टर, तेल्हारा तालुक्यात १५ गावांत ६६६१ हेक्टर, बाळापूर तालुक्यातील २२ गावांत ३४८५ हेक्टर, तर पातूर तालुक्यात ३० गावांत कपाशी, सोयाबीन व तूर पिकांचे तब्बल ११ हजार ९०० हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले आहे. .Crop Damage : शेतकऱ्यांचे मोठे नुकसान, संवेदनशीलतेने काम करावे.सप्टेंबरमधील अतिवृष्टीमुळे खरीप हंगामावर मोठा परिणाम झाला आहे. कापूस व सोयाबीन या नगदी पिकांबरोबरच इतरही पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत..आधीच उत्पादन खर्च वाढलेला असताना आता नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या या नुकसानीने शेतकऱ्यांवर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे .सततच्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात खरीप हंगाम संकटात सापडला आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तत्काळ आर्थिक मदत, मिळावी अशी मागणी होत आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.