Sindhudurg News : गेल्या काही दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने जिल्ह्यात जोरदार कमबॅक केले असून जिल्ह्याच्या बहुतांशी मंगळवारी झोडपून काढले आहे. बुधवारी (ता. १३) सकाळपासून देखील सर्वदूर पावसाच्या जोरदार सरी सुरू आहेत. त्यामुळे नदीनाल्यांच्या पाणीपातळीत चांगली वाढ झाली आहे. जिल्ह्यातील सर्वच पिकांना हा पाऊस पोषक मानला जात आहे. .जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर कमी झाला होता. काही भागात हलक्या सरी तर काही भागात पूर्णपणे उघडीप पावसाने दिली होती. गेले चार, पाच दिवस तर अनेक भागांत पावसाने पूर्णतः उघडीप दिली होती..Rain Update : कर्जत, जामखेड, श्रीगोंदा तालुक्यांत पावसाने दिलासा.परंतु जिल्ह्यात मंगळवारी सकाळपासून पावसाचे वातावरण निर्माण झाले. जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यात पहाटेपासून पावसाची रिपरिप सुरू झाली. वैभववाडी, मालवण, कुडाळ, कणकवली तालुक्यांत जोरदार पाऊस झाला. .Heavy Rain: दमदार पावसाने ४६ हजार हेक्टरवरील पिकांना संजीवनी.सायंकाळी उशिरा पावसाच्या सरीवर सरी सुरू होत्या. जिल्ह्यात पावसाच्या जोरदार सरी कोसळत असल्याने नदीनाल्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली. दरम्यान, आज सकाळपासून देखील मुसळधार पाऊस सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून पावसाने उघडीप दिली होती. या पावसामुळे पिकांना दिलासा मिळाला आहे. .सिंधुदुर्गात ‘येलो अलर्ट’सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. पावसाचा हा जोर आणखी चार पाच दिवस कायम राहण्याचा अंदाज आहे. हवामान विभागाने १६ ऑगस्टपर्यंत ‘येलो अलर्ट’ दिला आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.