Rain Damage in Mulberry Cultivation: मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी प्रतिकूल परिस्थितीत तारणहार ठरलेल्या रेशीम उद्योगासाठी अत्यावश्यक तुती लागवडीवर पावसाअभावी टाच आली आहे. यंदा तुती लागवडीच्या मिळालेल्या उद्दिष्टाच्या तुलनेत आतापर्यंत केवळ ११ टक्केच लागवड झाली आहे..रेशीम उद्योग मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात स्वीकारला. त्या उद्योगाने उत्पन्नाची शाश्वती दिल्याने शेतकरी मोठ्या प्रमाणात या उद्योगाकडे वळले व वळण्याचा ओघ अजूनही सुरूच आहे. सुमारे ९४२ गावांत कमी अधिक प्रमाणात रेशीम उद्योग शेतकरी करतात. यंदा मात्र ‘एल निनो’च्या संकटाने पावसाने दांडी मारली आणि त्याचा थेट आघात खरिपांच्या पिकावर मोठ्या प्रमाणात झाला. आता रेशीम उद्योगासाठी लागणाऱ्या तुती लागवडीवरही पावसाअभावी टाच आल्याची बाब प्रकर्षाने पुढे आली आहे..Jalgaon Rainfall Deficit: जळगावात पावसाअभावी पिके कोमेजण्याच्या मार्गावर.महारेशीम अभियान २०२६ अंतर्गत मराठवाड्यात सुमारे ३३५० एकर तुती लागवडीचे उद्दिष्ट आठही जिल्ह्यांना मिळाले होते. रेशीम कोषांना मिळणारा चांगला दर आणि शाश्वत उत्पन्न यामुळे शेतकऱ्यांनी महारेशीम अभियानाला चांगला प्रतिसाद दिला. आठही जिल्ह्यांत सुमारे ३७७८ शेतकऱ्यांनी ३८९७ एकर क्षेत्रावर तुती लागवडीची तयारी दर्शविली. परंतु या सर्व शेतकऱ्यांच्या तुती लागवडीच्या निर्णयाला पावसाअभावी ग्रहण लागले. .आजवर सुमारे ४६० शेतकऱ्यांनी केवळ ४३७ एकरांवरच तुती लागवड केली. इतर शेतकऱ्यांना इच्छा असूनही पावसाअभावी तुती लागवड करण्यात आतापर्यंत अडचण आल्याची स्थिती आहे. यापुढेही पाऊस न आल्यास यंदा तुती लागवडीसाठी मिळालेले उद्दिष्ट पूर्ण होण्याची आशा धूसर होण्याची चिन्ह आहेत. २०२५-२६ मध्ये मराठवाड्यात १४२७ शेतकऱ्यांनी १४६७ एकरांवर तुती लागवड केली होती. दुसरीकडे २०२४-२५ मध्ये मराठवाड्यातील १२६८ शेतकऱ्यांनी १३०० एकरांवर तुतीची लागवड केली होती होती. आधीची मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत सुमारे १०२५३ शेतकऱ्यांचे १०६६१.५ एकर तुती पीक आहे..Rainfall Deficit: पावसाअभावी खरीप संकटात.बीड जिल्ह्यात सर्वांत कमी लागवडमराठवाड्यासह राज्यात बीड जिल्हा रेशीम कोष उत्पादक जिल्हा म्हणून ओळखला जातो. यंदा या जिल्ह्याला मिळालेल्या उद्दिष्टाच्या तुलनेत आतापर्यंत केवळ ६ टक्के तुती लागवड झाली आहे. जी मराठवाड्यात सर्वांत कमी आहे. दुसरीकडे परभणी जिल्ह्यात उद्दिष्टाच्या ८ टक्के, लातूर व हिंगोली या दोन्ही जिल्ह्यांत उद्दिष्टाच्या प्रत्येकी १२ टक्के, धाराशिवमध्ये १३ टक्के, जालन्यात १४ टक्के, तर छत्रपती संभाजीनगरमध्ये उद्दिष्टाच्या तुलनेत २१ टक्के तुती लागवड झाली आहे..जिल्हानिहाय उद्दिष्टाच्या तुलनेत तुती लागवड (एकर)जिल्हा क्षेत्र प्रत्यक्ष लागवडछ. संभाजीनगर ३५० ८३जालना ४०० ५०परभणी ३५० ३०हिंगोली २५० २७नांदेड ३०० ७४लातूर ३५० ३२धाराशिव ६५० ४६बीड ७०० ९५.मराठवाड्यातील शेतकऱ्यांना आर्थिक उत्पन्नाचे मुख्य स्त्रोत होऊ घातलेला तुती आधारित रेशीम उद्योग हा सुद्धा या वेळच्या ‘एल निनो’च्या प्रभावामुळे अडचणीत आला आहे. रेशीम कोष बाजारपेठेत ९५० ते १००० प्रति किलो असताना सुद्धा विहिरीला पाणी नसल्याने बॅच वेळेत घेता येत नाही. आणि नवीन लागवड करण्यासाठी तयारी असताना सुद्धा करू शकत नाही. त्यामुळे लागवडीवर विपरीत परिणाम झाला आहे.डॉ. महेंद्र ढवळे, उपसंचालक (रेशीम), मराठवाडा.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.