Maharashtra Weather Update: राज्यात पावसाचा जोर कायम असून, पश्चिम महाराष्ट्रातील १०७ मंडलांत अतिवृष्टीची नोंद झाली. शुक्रवारी (ता. २४) सकाळी सहा वाजेपर्यंतच्या २४ तासांत कोकणातील सूर्या परिसरात सर्वाधिक ३१९ मिलिमीटर पाऊस पडला. तर घाटमाथ्यासह धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू असल्याने धरणसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. अनेक धरणे पूर्ण क्षमतेने भरली असून, नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे..राज्यातील विविध भागांत सुरू असलेल्या दमदार पावसामुळे प्रमुख धरणांमध्ये मोठ्या प्रमाणात नवीन पाण्याची आवक झाली आहे. कोयना धरणात ३.०२ टीएमसी (अब्ज घनफूट), उजनीत ३.२६ टीएमसी आणि जायकवाडीमध्ये ०.७७ टीएमसी नवीन पाण्याची आवक झाली. तसेच भंडारदरा धरणात १,२६६ दलघफूट (दशलक्ष घनफूट), निळवंडेत १,१५२ दलघफूट आणि मुळा धरणात ७२० दलघफूट पाणी आले. वाढत्या आवकेच्या पार्श्वभूमीवर अनेक धरणांतून विसर्ग वाढविण्यात आला आहे. सध्या कोयना धरणात ६७.३४ टक्के, उजनीत ८२ टक्के आणि जायकवाडी धरणात ४९.३१ टक्के पाणीसाठा आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास प्रमुख धरणांतील पाणीसाठ्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे..कोकणात सूर्या परिसरात सर्वाधिक पाऊस :कोकण विभागात पावसाचा जोर सर्वाधिक राहिला. सूर्या परिसरात ३१९ मिलिमीटर, आंबोली येथे २९२ आणि वैतरणा परिसरात २३० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. सूर्या धरणातून १२,११८ क्युसेक क्षमतेने विसर्ग सुरू आहे. मुंबई महानगरपालिकेची मोडकसागर, तानसा आणि तुलसी धरणे १०० टक्के भरली आहेत. त्यामुळे धरणातून होणाऱ्या विसर्गामुळे नदी-नाले आणि सखल भागातील नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे..Rain Update: कोकण घाटमाथ्यावर पावसाचा इशारा; उर्वरित राज्यात उघडीप.नागरिकांनी सतर्क राहावेधरणांच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेला पाऊस आणि वाढती पाण्याची आवक लक्षात घेऊन विविध धरणांतून विसर्ग सुरू आहे. त्यामुळे नदीपात्रात उतरणे, नदीकाठावर जाणे किंवा पूरस्थिती असलेल्या भागातून प्रवास करणे टाळावे. शेतकऱ्यांनी शेतातील पाण्याचा निचरा होण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात. प्रशासन आणि जलसंपदा विभागाकडून देण्यात येणाऱ्या सूचनांचे नागरिकांनी पालन करावे, अशा सूचना संबंधित विभागांच्या वतीने देण्यात आल्या आहेत..पुणे जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यात जोरपुणे जिल्ह्यातील मुळशी धरणक्षेत्रात २५० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. जिल्ह्यातील धरणसाठ्यात वाढ होत असून, चासकमान धरण ९७.६८ टक्के, पवना ९४.७३ टक्के, पानशेत ८२.३२ टक्के आणि मुळशी धरण ८४.१६ टक्के भरले आहे. खडकवासला आणि वीर धरणे १०० टक्के भरली आहेत. चासकमानमधून १० हजार, वीरमधून ९,२७४, दौंडमधून ३१,२७५ आणि खडकवासला धरणातून ९,४०५ क्युसेक विसर्ग सुरू आहे. पुणे जिल्ह्याच्या पश्चिम भागातील मावळ, मुळशी आणि घाटमाथ्यालगतच्या भागात पावसाचा जोर कायम असल्याने धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाणी जमा होत आहे. खरीप हंगामातील पेरणी झालेल्या क्षेत्रात पिकांची वाढ सुरू असली, तरी अतिपावसाच्या भागात शेतकऱ्यांनी शेतात पाणी साचणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे..Heavy Rain Update : बार्शी तालुक्यात अतिवृष्टीने शेतीपिकांचं नुकसान; खासदार ओम राजेनिंबाळकरांचं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन .घाटघर परिसरात मुसळधारअहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील घाटघर येथे २२०, रतनवाडी २०६ आणि पांजरे येथे २०३ मिलिमीटर पाऊस झाला. भंडारदरा परिसरात १८२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. भंडारदरा धरणातून १४,१८२, देवठाणमधून ४,४८३, ओझरमधून ४,४३१ आणि कोतुळमधून १३,३७५ क्युसेक विसर्ग सुरू आहे. भंडारदरा धरणात १,२६६ दलघफूट, तर मुळा धरणात ७२० दलघफूट नवीन पाण्याची आवक झाली आहे. आढळा आणि भोजापूर धरणे ओव्हरफ्लो झाली आहेत..गोदावरी खोऱ्यात विसर्गनाशिक जिल्ह्यातील इगतपुरी येथे २४०, त्र्यंबकेश्वर १८९ आणि घोटी येथे १७२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. गंगापूर धरण ९८.२६ टक्के भरले आहे. गंगापूरमधून १४,४०७, दारणातून १९,३१२ आणि कडवातून १२,८३० क्युसेक विसर्ग सुरू आहे. नांदूर-मध्यमेश्वर बंधाऱ्यातून ८८,९३५ क्युसेक विसर्ग सुरू असल्याने गोदावरी खोऱ्यातील नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहणे आवश्यक आहे..शुक्रवार (ता.२४) सकाळी आठ वाजेपर्यंत पडलेला पाऊस. (मिलिमीटरमध्ये)घाटमाथा : शिरगाव २४५, ताम्हिणी २६०, भिरा २२२, डावडी २१२, डुंगरवाडी १५१, कोयना (नवजा) १२२, ठाकरवाडी १०५, अंबोणे ९३, भिवपुरी ९३, वांगाव ९०, लोणावळा ८३, खोपोली ७८, खांड ७७, वळवण ७०, लोणावळा (टाटा) ६०, शिरोटा ४३, धारावी ३३ आणि कोयना (पोफळी) ३२ मिलिमीटर..कोकण : वाशिंद १४२, वाडा १४१, विक्रमगड १४०, मनोर-कुडूस १३२, विरार १३०, बोईसर १२६, तारापूर १२५, आटगाव ११८, आगरवाडी ११७, चिंचवली ११४, नेरळ ११०, अंगाव १०९, कडव १०६, कासेळे १०४, खालापूर, वावोशी, म्हासा १०१, अज्ञात १००, कर्जत, पाथराज चौक, वासांबे ९७, पडघा, राहूर ९७, खोपोली ९६, विले निजामपूर ९५, कलंब ९४, कर्नाळा ९०, तळा ८९, शाहपूर, खिरविरे ८५, देहरी, कामरळी ८४, ओवळे, उरण, कोप्रोली, हमरापूर ८२, माणगाव, इंदापूर, लोणेरे ८०, आंबेवाडी ७६, नांदगाव, कुशगाव ७५, पेण ७४, सायखेडा ७३, नेरे ७२, जसई, गोरेगाव, भरणे ७१, चारी ७०, जांभूळपाडा ६५, भिवंडी ६५..मध्य महाराष्ट्र : त्र्यंबकेश्वर २५२, वेलुंजे १९५, शेंडी, वाकी १३९, महाबळेश्वर,नाशिक १०९, देवळाली ११४, मढसांगवी १०४, माले, मुठे, पोमगाव, पानशेत ९७, लमाज ९५, विंझर ९०, आंबेगाव ८४, बामणोली, तापोळा ८२, भगूर ८१, मखमलाबाद ८०, नवापूर, नवागाव, चिंचपाडा, विसरवाडी, मोहाडी, चांदोरी, ओझर ७७, सातपूर ७४, लोणावळा ७४, ताकवे खुर्द ७६, वेल्हा ६६, आंबावणे ६६, केळघर, करहर ६६, शिंदे ६८, ताकवे बुद्रुक ६८, कुळवंडी ६७, कोळवण ७०..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.