Pune News: राज्यातील विदर्भ, मराठवाडा, कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांना रविवारी (ता.२२) आणि सोमवारी (ता.२३) अवकाळी पावसाचा तडाखा बसला. नागपूर, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांत येथे विजांच्या कडकडाटांसह पाऊस झाला. तर यवतमाळ आणि नांदेड जिल्ह्यांत सोमवारी गारपीट झाली. तसेच परभणी, बीड जिल्ह्यांत झालेल्या पावसाने रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले. विशेषतः गहू, हरभरा, मका या पिकांवर याचा परिणाम होण्याची शक्यता आहे..यवतमाळमध्ये गारपीटयवतमाळच्या मारेगाव, आर्णी, महागाव उमरखेड या तालुक्यांना पावसाचा जोरदार फटका बसला. काही तालुक्यांमध्ये सोमवारी दुपारी १५ ते २० मिनिटे गारपीट झाली. सध्या हरभरा काढणी आणि मळणीचा हंगाम जोरावर आहे. त्यासोबतच गहूदेखील उभा आहे. या सर्व पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचा अंदाज आहे. या संदर्भात कृषी विभागाशी संपर्क साधला असता अद्याप नुकसानीबाबत कोणतीही माहिती नसल्याचे त्यांच्याद्वारे सांगण्यात आले..Rain Alert: मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी पावसाचा तडाखा.नांदेडला रब्बी पिकांचे नुकसाननांदेड जिल्ह्यात अनेक ठिकाणी सोमवारी दुपारी दोननंतर अनेक भागांत वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला. तर किनवट तालुक्यात गारपीट झाली. या आपत्तीमुळे रब्बीतील गहू, मका, ज्वारी या रब्बी पिकांसह आंबा या फळ पिकांचेही नुकसान झाले आहे..सोमवारी पूर्व विदर्भातील काही जिल्ह्यांसह यवतमाळमध्ये झालेल्या गारपिटीमुळे रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले. यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव, उमरखेड, महागाव, आर्णी या तालुक्यांना सर्वाधिक जास्त तडाखा बसला.हवामान खात्याने पूर्व विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये सोमवारी पावसाचा अंदाज वर्तविला होता. त्यानुसार भंडारा, गोंदियाच्या काही भागांत पावसाने हजेरी लावली. .काढणीस आलेल्या हरभऱ्याचे यामुळे सर्वाधिक नुकसान झाले. मात्र रविवारी सुट्टी असल्याने नुकसानीचा अधिकृत आकडा कळू शकला नाही. नागपूरच्या कळमना बाजार समितीमध्ये अचानक आलेल्या पावसामुळे धान्याची पोती भिजल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले. मात्र रविवारी बाजार बंद असल्याने हा माल शेतकऱ्यांचा नसून व्यापाऱ्यांचा असल्याचा दावा बाजार समितीने केला आहे. नागपूरमध्ये दहा मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे..Unseasonal Rain: आरगावसह चार गावांत वादळी पाऊस.परभणी जिल्ह्यातही नुकसानपरभणी जिल्ह्यातील बहुतांश भागात सोमवारी दुपारी हलका ते मध्यम पाऊस झाला. रब्बीतील ज्वारी, गहू, हरभरा, करडई आदी पिकांचे मोठे नुकसान झाले. जिल्ह्यात सध्या हरभरा, ज्वारी पिकांची काढणी सुरू आहे. पाथरी, सोनपेठ, गंगाखेड, पालम, पूर्णा, परभणी, जिंतूर, मानवत तालुक्यातील अनेक ठिकाणी वाऱ्यासह हलका ते मध्यम पाऊस झाला..कोकणात काजू, आंबा पिकाला धोकाकोकणातील काजू आणि आंबा पिकाला आधीच हवामान बदलाचा फटका बसला आहे. काजू, आंब्याचा मोहर करपला असल्याने बागायतदार शेतकरी चिंतेत आहे. तर आता अवकाळी पावसाने काजू, आंबा पिकाचे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. रत्नागिरीत रविवारी पाऊस झाला. काही ठिकाणी वादळी पावसामुळे फळ गळती झाली असल्याचे दिसून आले आहे. कोकणातील फोंडाघाट परिसरात रविवारी पाऊस झाला..बीड जिल्ह्यात भाजीपाल्याचे नुकसानबीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यासह धारूर तालक्यात सोमवारी झालेल्या पावसाने ज्वारी, बाजरी, गहू, हरभरा, टरबूज-खरबूज कांदे, भाजीपाला आदी पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.