Guntur Chilli Prices: आंध्र प्रदेशातील प्रमुख बाजारपेठांमध्ये मिरचीच्या दरात वाढ झाल्याने उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. देश- विदेशात निर्यातीसाठी वाढलेली मागणी, बाजारात होत असलेली मर्यादित आवक आणि शेतकऱ्यांनी विक्रीबाबत घेतलेल्या सावध भूमिकेमुळे मिरचीचे दर उच्चांकावर पोहोचले आहे. विशेषतः आशियातील सर्वात मोठी मिरचीची बाजारपेठ असलेल्या गुंटूर मिरची यार्डमध्ये (Asia Largest Chilli Market Guntur) दर तेजीत असल्याचे व्यापाऱ्यांनी म्हटले आहे..सर्वाधिक मागणी असलेल्या तेजा (एस-१७) वाणाचा दर उच्चांकी प्रतिक्विंटल २४,५०० रुपयांवर पोहोचला आहे. तर गुणवत्ता आणि ओलाव्यानुसार सरासरी भाव १३ हजार ते २२ हजार रुपयांच्या दरम्यान आहे. येथील बाजारात मिरचीच्या इतर वाणांच्या दरातही लक्षणीय वाढ झाली असल्याचे दिसून आले आहे..आणखी भाववाढीची शक्यता असल्याने अनेक शेतकऱ्यांनी त्यांचा शेतमाल बाजारात आणलेला नाही. यामुळे आवक कमी असल्याचे व्यापारी सांगतात. शेतकऱ्यांना त्यांचा शेतमाल बाजारात आणण्याची घाई करायची नाही. गेल्या हंगामात बाजारात अतिरिक्त आवक आणि भावातील घसरणीमुळे शेतकऱ्यांना नुकसान सोसावे लागले होते. यामुळे यंदा शेतकऱ्यांनी सावध भूमिका घेतली आहे. ते आणखी दरवाढ होण्याची वाट पाहात असल्याचे काही व्यापाऱ्यांनी सांगितले. .Chilli Cultivation: रोपनिर्मितीपासून मिरची लागवडीचे संपूर्ण मार्गदर्शन.निर्यातीसाठी मागणी वाढल्याने दरात तेजी आली असल्याचे दिसते. चीन, बांगलादेश आणि आग्नेय आशियाई देशांतील खरेदीदार विशेषतः गडद लाल रंगाची आणि कमी ओलावा असलेली मिरची खरेदी करत आहेत. तसेच मिरची पूड उत्पादक, मसाला प्रक्रिया उद्योग आणि शीतगृहांकडून मागणीही वाढली आहे. यामुळे खुल्या बाजारात मिरचीची आवक कमी झाले असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. .Sankeshwari Chilli: संकेश्वरी मिरचीचा हंगाम अतिवृष्टीमुळे कोमेजला.अवकाळी पावसाने पिकाचे नुकसान झाल्याने स्थानिक पातळीवरूनदेखील मिरचीला मागणी वाढली असल्याचे निर्यातदार सांगतात. सध्याच्या दरातील तेजीमुळे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. कारण यामुळे वाढता उत्पादन भरून निघण्यास मदत होणार आहे..गुंटूर आशियातील सर्वात मोठी मिरचीची बाजारपेठ, १० हजार कोटींची उलाढालविशेषतः गुंटूर, प्रकाशम जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात मिरचीची पीक घेतले जाते. गुंटूर हा मिरचीचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. या जिल्ह्यातील एकूण बागायती क्षेत्रापैकी ७५ टक्के क्षेत्रावर मिरची पिकाची लागवड केली जाते. म्हणूनच गुंटूर जिल्ह्याला 'भारताचे मिरची शहर' असे म्हटले जाते. गुंटूर मार्केट यार्ड ही आशियातील सर्वात मोठी मिरचीची बाजारपेठ आहे. या बाजारपेठेतील दराचा देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील मिरचीच्या दरावर नेहमीच प्रभाव राहिला आहे. आंध्र प्रदेशातील एकट्या गुंटूर जिल्ह्यात देशातील एकूण मिरची उत्पादनापैकी १५ टक्के उत्पादन घेतले जाते. संपूर्ण आंध्र प्रदेशाचे देशातील एकूण मिरची उत्पादनात ४० टक्के योगदान आहे.गुंटूर मिरची यार्डमधून दरवर्षी २० हून अधिक देशांत दीड लाखाहून अधिक मिरची पोती ( प्रत्येकी ४० किलो वजनाची) निर्यात केली जातात. या निर्यातीतून १० हजार कोटींची उलाढाल होते. यातून राज्य सरकारला १०० कोटींचा महसूल मिळतो. गेल्या वर्षी याच कालावधीत मिरचीचे दर घसरले होते. यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला होता. यंदा दर वधारल्याने शेतकरी सुखावले आहेत. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.