Drinking Water Challenges: रायगड जिल्ह्यातील भूगर्भातील पाणीपातळी चिंताजनकरीत्या खालावत असून पिण्याच्या पाण्याबरोबरच शेतीसाठीच्या पाणीपुरवठ्याबाबतही गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेने मे महिन्यात केलेल्या निरीक्षणानुसार जिल्ह्यातील ११ तालुक्यांमध्ये मागील पाच वर्षांच्या सरासरीच्या तुलनेत भूजल पातळीत घट नोंदविण्यात आली आहे. त्यामुळे आगामी काळात पाणीटंचाईचे संकट तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे..जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यात सर्वाधिक -१.९० मीटर इतकी भूजल पातळी घसरली आहे. परिणामी, अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. पोलादपूरप्रमाणेच पनवेल, अलिबाग, कर्जत, खालापूर, माणगाव आणि पेण या तालुक्यांमध्येही भूजल पातळीत घट झाली आहे. विशेष म्हणजे, मागील वर्षी सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडूनही भूगर्भातील जलसाठ्यात अपेक्षित वाढ झालेली नाही. .Water levels Drop: लघू प्रकल्पांत दोन टक्के,तर मध्यम प्रकल्पांत तीन टक्के घट.जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर खोदण्यात आलेल्या कूपनलिका आणि बोअरवेलद्वारे भूगर्भातील पाण्याचा मोठ्या प्रमाणावर वापर होत आहे. याचा परिणाम विहिरी, कूपनलिका आणि इतर पारंपरिक जलस्रोतांवर दिसून येत आहे. त्यामुळे उन्हाळ्यातील पाणीटंचाई अधिक तीव्र होण्याबरोबरच शेती, पशुपालन आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेवरही त्याचे परिणाम जाणवू लागले आहेत..Groundwater Level: विहिरी तळाला; धोका पिकाला.भूजल पाणी पातळी मोजण्यासाठी जिल्ह्यातील ५२ विहिरींची निवड करण्यात आलेली आहे. या विहिरींची सप्टेंबरमध्ये घेतलेल्या आकडेवारीनुसार रायगड जिल्ह्यात भूजल पातळी वाढलेली दिसून येत आहे. या संदर्भातील कल्पना आम्ही संबंधित विभागांना उपाययोजनांसाठी दिली असल्याची माहिती भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या वरिष्ठ भूवैज्ञानिक सुजाता हिंगोळे यांनी सांगितले..रोह्यात सर्वाधिक वाढज्या चार तालुक्यांमध्ये भूजल पातळीत वाढ झालेली आहे त्यामध्ये रोहा तालुक्यात १.२२ मीटरची वाढ झालेली आहे. त्यानंतर मुरूड, श्रीवर्धन आणि सुधागड तालुक्यात नोंदली गेली आहे..कूपनलिकांना खारे पाणीकिनारपट्टीलगतच्या गावांमध्ये काही अंतरावर बोअरवेल्सना पाणी लागत असले तरी ते खारे असल्याने येथील पाण्याची समस्या अधिकच गंभीर होत आहे. मुरूड, श्रीवर्धन या किनारपट्टीलगतच्या तालुक्यांमध्ये काही प्रमाणात भूजल पातळी वाढली असली तरी त्याचा काहीही उपयोग पिण्याच्या पाण्यासाठी होत नाही, असे येथील नागरिकांचे म्हणणे आहे, त्यामुळे येथील पाणीटंचाई अधिकच गंभीर होत आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.