Sangli News: पीकविमा घेऊनही जाचक अटींमुळे तो मिळण्यात अडचणी येत असल्यामुळे जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादकांनी पीकविम्याकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे यंदाच्या अंबिया बहरात द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी केवळ ६ हजार ६५ एकरांवरच पीकविमा घेतला आहे. .जिल्ह्यात तब्बल एक लाख एकरांवर द्राक्ष पीकाचा विस्तार झाला आहे. नैसर्गिक आपत्तीच्या जोखमीसमोर शेतकरी असुरक्षित आहे. त्यामुळे प्रधानमंत्री फळ पिक विमा शासनाने सुरु केली आहे. शेतकरी विमा घेत पिकाला संरक्षित करतात..Fruit Crop Insurance: फळ पीकविमा योजनेत पाच हजार शेतकऱ्यांचे अर्ज.मात्र, पीक विमा घेतला तरी जाचक अटीमुळे नुकसान होऊन देखील भरपाई मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी पीकविम्याकडेच पाठ फिरवली आहे. यंदाच्या अंबिया बहरात द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी केवळ ६ हजार ६५ एकरावरच विमा घेतल्याचे चित्र आहे..अशा परिस्थितीत द्राक्ष हे संवेदशील पिक असल्याने शेतकऱ्यांना काटेकोर व्यवस्थापन करत बागा साधव्या लागत आहेत. पाऊस, अति पाऊस, अवेळी पाऊस, वारा, गारपीट अशा विविध निसर्गाच्या आघाताचा सामना करावा लागतो. या नैसर्गिक संकटामुळे बागांचे नुकसान होते..Fruit Crop Insurance: फळपीक विमा नोंदणीस मुदतवाढ.त्यामुळे शासनाने पीक नुकसान झाले तर, भरपाई मिळावी यासाठी प्रधान मंत्री फळ पिक योजनेअंतर्गत पुनर्रचित हवामान आधारीत फळ पिक योजना सुरु केली आहे. शेतकऱ्यांनी विमा योजनेत सहभागी व्हावे यासाठी कृषी विभागाच्या माध्यमातून गावोगावी प्रचार प्रसारही करतात. शेतकऱ्यांना विमा का गरजेचा आहे, याचे मार्गदर्शनही करतात. यामुळे शेतकरी विमा घेण्यासाठी पुढाकार घेतात..यंदाच्या या विम्यामध्ये ४ हजार ९८५ शेतकऱ्यांनी द्राक्ष विमा घेत २४२६ हेक्टरवरील पिकांना संरक्षण दिले आहे. गतवर्षी ४०८५ शेतकऱ्यांनी विमा घेतला होता. गतवर्षी निसर्गाच्या आघातामुळे द्राक्षाचे नुकसान झाले होते. त्यामुळे बाधित पिकांचे पंचनामे करुन त्याचा अहवाल वरिष्ठ पातळीवर सादर करत नुकसान १७ कोटी ९१ लाख भरपाईही अदा केली आहे. तर सन २०२३-२-२४ मध्ये १८ कोटी ३३ लाख भरपाई शेतकऱ्यांना दिली आहे. मात्र, किती शेतकऱ्यांना ही भरपाई मिळाली याबाबत स्पष्टता नसल्याचे चित्र आहे..ट्रिगरमध्ये बदलाची मागणीनैसर्गिक आपत्तीने द्राक्ष पीकाचे नुकसान होते. परंतु शासनाने भरपाईसाठी घातलेल्या जाचक अटीमुळे शेतकऱ्यांना भरपाई मिळत नसल्याने मोठ्या प्रमाणात द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी पीक विम्याकडे पाठ फिरवली आहे. शासनाने विम्याच्या अटी, पावसाचे ट्रिगरमध्ये बदल करावा अशी मागणी गेल्या अनेक वर्षापासून शेतकरी करत आहेत. मात्र, या मागणीकडे शासनानेही दुर्लक्ष केले आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.