Sangli News: सांगली जिल्ह्यातील द्राक्ष पिकाला अतिवृष्टीचा फटका बसला असल्याने निर्यात करणाऱ्या शेतकऱ्यांची नोंदणीही घटली आहे. द्राक्ष निर्यातीस प्रारंभ झाला असला तरी निर्यात संथ गतीनेच सुरू आहे. शुक्रवार (ता. ३०) अखेर युरोपसह आखाती देशात अवघी २९८ टन इतकीच निर्यात झाली आहे. गतवर्षी याच दरम्यान अंदाजे एक हजार टनाची द्राक्ष निर्यात झाली होती..जिल्ह्यात द्राक्ष पिकाला पोषक वातावरण असल्याने गुणवत्तापूर्ण द्राक्षाचे उत्पादन घेतले जात आहे. त्यामुळे शेतकरी द्राक्ष निर्यातीस पुढे येत असल्याचे चित्र आहे. गतवर्षी जिल्ह्यातून १० हजार १६५ शेतकऱ्यांनी १७ हजार ८७९ टन द्राक्षाची निर्यात केली होती. वास्तविक पाहता, गत वर्षीही अतिवृष्टीमुळे झाली असताना द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांवर संकट ओढावले होते..Grape Price: द्राक्षांना यंदा विक्रमी दर.तरीही त्यातून शेतकऱ्यांनी द्राक्ष निर्यातीसाठी पुढाकार घेतला. द्राक्ष निर्यात अधिक व्हावी यासाठीही कृषी विभागाने शेतकऱ्यांना नोंदणीसाठी आवाहन केले होते. त्यामुळे प्रतिकूल परिस्थितीतही शेतकऱ्यांनी नोंदणी करत कृषी विभागाने ठेवलेले निर्यातीचे उद्दिष्टापर्यंत पोहोचता आले..पावसामुळे गत वर्षी द्राक्ष पिकाला सर्वाधिक फटका बसला. परिणामी द्राक्षाचे उत्पादन ४० ते ५० टक्क्यांपर्यंत कमी झाले. जिल्ह्यातून यंदा १८ हजार नोंदणीचे उद्दिष्ट ठेवले होते. यंदा निर्यातीसाठी ७०९० शेतकऱ्यांनी बागांची नोंदणी झाली असून ३७२० हेक्टरवरील द्राक्षाची निर्यात होणार आहे. तर, गत वर्षी जिल्ह्यातून १० हजार १६५ शेतकऱ्यांनी नोंदणी केली होती. यंदाच्या हंगामात ३ हजार ७५ शेतकऱ्यांची संख्या कमी झाली आहे..Grape Orchard Issue: द्राक्ष बागांवर कुऱ्हाड.द्राक्षाची निर्यात सुरू झाली असून, सर्वांत पहिल्यांदा आखातीदेशात निर्यातीचा प्रारंभ होतो. यंदा युरोपसह आखाती देशात २९८ टन इतकी द्राक्षाची निर्यात झाली आहे. वास्तविक पाहता गत वर्षीच्या तुलनेत यंदा द्राक्ष निर्यातीची गती फारशी मंदावली असल्याचे चित्र आहे. फेब्रुवारीच्या मध्यापासून द्राक्ष निर्यातीस गती येईल असा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे..निर्यात कक्षाकडून जनजागृती नाहीचजिल्ह्यातून द्राक्षासह अन्य भाजीपाला आणि फळांची निर्यात होते. कृषी कार्यालयात निर्यात कक्ष आहे. या कक्षाच्या माध्यमातून निर्यातीचे कामकाज होते. निर्यात वाढविण्यासाठी हा विभाग शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करते. गत वर्षी या कक्षाने प्रत्येक तालुक्यातून द्राक्षाची निर्यात वाढावी यासाठी शेतकऱ्यांमध्ये जागृती करत नोंदणीही वाढवण्यासाठी पुढाकार घेतला होता..मात्र, यंदा या कक्षाने तालुका स्तरावर याबाबत जागृती केली नसल्याचे चित्र आहे. अतिवृष्टीमुळे द्राक्षाचे नुकसान झाले असल्याने निर्यातीची नोंदणी घटली असल्याचे सांगण्यात येत आहे. शेतकऱ्यांना नोंदणी करण्यासाठी प्रवृत्तच केले नाही, यामुळे नोंदणी कमी झाली असल्याचे कृषी विभागाच्या एका अधिकाऱ्यांनी सांगितले..तालुकानिहाय द्राक्ष निर्यात दृष्टीक्षेपतालुका नोंदणी क्षेत्रतासगाव १५१८ ७८७.०८खानापूर ९१३ ४६९.९५मिरज ९२२ ४७०.४२जत २१८८ १२७१.२९.कवठेमहांकाळ ११६७ ५१५.५८आटपाडी ९४ ९१.०४पलूस १४६ ७२.६४वाळवा ११३ ५७.५६कडेगाव २६ १५.२१एकूण ७०९० ३७२०.७७.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.