Latur News: रब्बी हंगामात यंदा लातूर जिल्ह्यात १२३ टक्के पेरणी झाली असून, जिल्ह्यात यंदाही हरभरा हेच हुकमी पीक आहे. धाराशिव जिल्ह्यात हरभराच्या तुलनेत गव्हाचा जास्त पेरा झाला तरी मकाचे क्षेत्र चांगलेच वाढले आहे. तब्बल १४५ टक्के क्षेत्रावर मकाची पेरणी झाली आहे. वातावरणात बदलाचा फटका रब्बी पिकांना बसत असून, हरभऱ्यावर घाटे तर ज्वारीवर लष्करी अळीचा प्रादुर्भाव जाणवत आहे. यामुळे शेतकऱ्यांकडून फवारणीला प्राधान्य दिले जात आहे. .यंदा उशिरापर्यंत पाऊस राहिल्यामुळे रब्बीच्या क्षेत्रात चांगलीच वाढ झाली आहे. लातूर जिल्ह्यात तीन लाख १८ हजार ६८८ हेक्टर रब्बीचे क्षेत्र असून, आतापर्यंत तीन लाख ९२ हजार २९७ हेक्टरवर (१२३ टक्के) पेरणी झाली आहे. धाराशिव जिल्ह्यात रब्बीचे चार लाख १७ हजार ९०२ हेक्टर क्षेत्र असून चार लाख ६१हजार ५०९ हेक्टवर (११०) पेरणी झाली आहे. लातूर जिल्ह्यात हरभरा पिकांचे क्षेत्र दोन लाख ५७ हजार ४८ हेक्टर क्षेत्र असले तरी यंदा तीन लाख २० हजार ४०७ हेक्टरवर सुमारे १२५ टक्के पेरणी झाली आहे..Chana Sowing: शिरोळ तालुक्यात रब्बीत हरभरा पेरणीचा उच्चांक.धाराशिव जिल्ह्यात दोन लाख २० हजार ७४५ हेक्टवर (१०५ टक्के) पेरणी झाली आहे. धाराशिव जिल्ह्यात हरभराच्या तुलनेत गव्हाचे क्षेत्र यंदा जास्त आहे. गव्हाचे क्षेत्र २५ हजार ८५५ हेक्टर असले, तरी प्रत्यक्षात २९ हजार ५६२ हेक्टरवर (११४ टक्क) गव्हाची पेरणी झाली आहे. मकाचे क्षेत्र सहा हजार २२८ हेक्टर असताना नऊ हजार २२३ हेक्टरवर (१४८ टक्के) पेरणी झाली आहे. लातूरमध्ये ज्वारी, गहू व करडईचे क्षेत्र शंभर टक्क्यांपेक्षा पुढे आहे. इतर गळीत धान्याच्या पेरणी क्षेत्रात ३८५ टक्क्यांनी वाढ झाली असून हे क्षेत्र दोन हजार ३९१ हेक्टरवर पोहचले आहे..काही दिवसात बदलत्या हवामानाचा परिणाम रब्बी पिकावर झाल्याचे दिसून येत आहे. रब्बी हंगामात हरभरा मोठ्या प्रमाणात घेतला जातो. सध्या पिकावर घाटे आळीचा प्रादुर्भाव आढळून येत आहे. याकरिता शेतकऱ्यांनी काळजी घेण्याची गरज आहे. रब्बी ज्वारी पोटरी ते कणसे भरण्याच्या अवस्थेत आहे. हरभरा पीक फुलोरा ते घाटे भरण्याच्या अवस्थेत आहे. गहू पीक फुलोरा ते दाणे भरणेच्या अवस्थेत आहे. करडई पीक कुठे बोंडे लागण्याच्या तर कुठे फुलारो लागण्याच्या अवस्थेत आहे. .Chana Sowing: हरभऱ्याचा ३ लाख १९ हजार हेक्टरवर पेरा.गेल्या काही दिवसापासून जिल्ह्यात वातावरणात बदल होत आहे. कधी कधी ढगाळ वातावरण राहत आहे. याचा परिणाम रब्बी पिकावर होताना दिसत आहे. हरभरा पिकावर घाटे अळीचा अल्प प्रमाणात प्रादुर्भाव आढळून येत आहे. तसेच रब्बी ज्वारी काही ठिकाणी लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. कधी थंडी, कधी ढगाळ वातावरण तर कधी कडक उन्हामुळे पिकावर परिणाम होण्याची शक्यता आहे. रोग किंवा किडीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्याने शेतकऱ्यांनी फवारणीसाठी लगबग सुरू केली आहे. दुसरीकडे तुषार सिंचनाने पिकांना पाणी देण्यासाठीही शेतकरी धावपळ करताना दिसत आहे..लातूर जिल्हारब्बी पेरणी : १२३ टक्केहरभरा पेरणी : १२५ टक्के (हुकमी पीक)ज्वारी, गहू, करडई : १०० टक्क्यांहून अधिक पेरणी.इतर गळीतधान्य क्षेत्रात ३८५ टक्के वाढधाराशिव जिल्हाएकूण रब्बी पेरणी : ११० टक्केहरभरा : १०५ टक्केगहू : ११४ टक्केमका : १४८ टक्के (लक्षणीय वाढ).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.