डॉ. उत्तम कदम, डॉ. सखाराम आघाव व डॉ. देवानंद बनकर रब्बी हंगामातील हरभरा हे पीक फुलोऱ्यापासून काढणीच्या अवस्थेत आहे. या पिकावर या अवस्थेत घाटे अळीचा प्रादुर्भाव दिसतो. ही बहुभक्षी कीड असून, कापूस, ज्वारी, मका, टोमॅटो, तूर व अन्य कडधान्य पिकांवरही आढळते. सध्याचे वाढते तापमान व मध्येच येणारे ढगाळ वातावरण किडीसाठी पोषक ठरते. या किडीमुळे हरभरा पिकाचे ३० ते ४० टक्क्यांपर्यंत नुकसान होऊ शकते..कीड व्यवस्थापनवेळोवेळी निंदणी किंवा कोळपणी करून पीक तण विरहित ठेवावे. बांधावरील कोळशी, रानभेंडी व पेटारी यासारखी तणे काढून नष्ट करावीत.इंग्रजी ‘टी’ आकाराचे पक्षिथांबे ५० प्रति हेक्टरी दर १५-२० मीटर अंतरावर लावावेत. त्यांची उंची पिकापेक्षा १ ते १.५ फूट अधिक असावी. त्यावर पक्षी बसून घाटे अळ्या वेचून खातात.घाटे अळीच्या सर्व्हेक्षणासाठी हेक्टरी ५ कामगंध सापळे (हेलील्यूर) जमिनीपासून १ मीटर उंचीवर लावावेत.पीक ५० टक्के फुलोऱ्यावर असताना व घाटे भरताना सुरुवातीच्या काळात अळीचा प्रादुर्भाव वाढल्यास शक्य तितक्या अळ्या हाताने वेचून नष्ट कराव्यात..Grape Crop Protection: ढगाळ वातावरणात भुरी नियंत्रणावर हवा भर.प्रतिबंधात्मक फवारणीशाकीय वाढीच्या अवस्थेतील पिकामध्ये निंबोळी अर्क (५ टक्के) किंवा ॲझाडिरॅक्टिन (१५०० पीपीएम) ५० मि.लि. प्रति १० लिटर पाणी या प्रमाणे प्रतिबंधात्मक फवारणी घ्यावी. १५ दिवसांच्या अंतराने दुसरी फवारणी घेतल्यास घाटे अळीचा पतंग अशा पिकावर अंडी घालणे टाळतो..जैविक नियंत्रणप्रथम व द्वितीय अवस्थेतील अळ्या दिसत असल्यास, एचएएनपीव्ही विषाणूवर (२५० एलई) आधारित कीटकनाशकाची १० मि.लि. प्रति १० लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी. विषाणूचे उन्हापासून संरक्षण व कार्यक्षमता वाढीसाठी १ ग्रॅम नीळ द्रावणामध्ये मिसळावी.बॅसिलस थुरिनजिएन्सीस प्रजाती कुर्सटाकी ४० ग्रॅम प्रति १० लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी.हवेतील आर्द्रता ७० टक्क्यांपेक्षा जास्त असल्यास बिव्हेरिया बॅसियाना (१.१५ टक्के विद्राव्य पावडर) ५० ग्रॅम प्रति १० लिटर पाणी ही फवारणी फायदेशीर ठरते..Crop Protection: थंडीच्या काळात काळजी घेण्याचे तज्ज्ञांचे आवाहन.घाटे अळीची आर्थिक नुकसान पातळीदोन अळ्या प्रति मीटर ओळींत आढळून आल्यास किंवा ५ टक्के घाट्यावर अळीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास अथवा सतत २-३ दिवस प्रत्येक कामगंध सापळ्यात ८ ते १० पतंग आढळून येत असल्यास..रासायनिक नियंत्रणघाटे अळीने आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडल्यास पुढील तक्त्यातील एका कीडनाशकाची फवारणी करावी. गरजेनुसार पुढील फवारणी कीटकनाशक बदलून १५ दिवसाने करावी..घ्यावयाची काळजीभाजीसाठी हरभऱ्याची कोवळी पाने काढून ती ताज्या स्वरूपात किंवा वाळवून वर्षभर वापरली जातात. अशी पाने तोडण्यापूर्वी पिकावर कीडनाशकाची फवारणी केलेली नसावी. कीडनाशक फवारणी केलेल्या पिकामध्ये त्या कीडनाशकाचा प्रतीक्षा कालावधी पूर्ण झाल्यानंतरच पाने खुडावीत. अन्यथा, भाजीमध्ये कीटकनाशकांचे अंश राहून आरोग्यास हानी पोहोचवू शकतात.- डॉ. देवानंद बनकर ७७५७९८७४५९संशोधन सहयोगी (क्रॉपसॅप), कीटकशास्त्र विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.