Hingoli News: सरकार निर्लज्ज आहे. दगाबाज आहे. निष्ठुर आहे. सरकार रझाकारांपेक्षा वाईट वागत आहे. अतिवृष्टीमुळे जमिनीचेच नव्हे तर शेतकऱ्यांचे आयुष्य वाहून गेलेय. शेतकऱ्यांना पॅकेजपेक्षा कर्जमुक्ती आणि हेक्टरी ५० हजार रुपये मदत मिळाली पाहिजे. शेतकरी काही फुकटचे मागत नाहीत..शेतीमालाला हमीभाव दिला तर सरकारसमोर हात पसरायची गरज येणार नाही, अशी टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली..Uddhav Thackeray: राज्यातील शेतकऱ्यांची सरकारकडून थट्टा .हिंगोली जिल्ह्यातील डोंगरकडा येथील शेतकऱ्यांशी शुक्रवारी (ता. ७) संवाद साधला. या वेळी खासदार नागेश पाटील आष्टीकर, माजी खासदार चंद्रकांत खैरे, अंबादास दानवे, डॉ. संतोष टारफे, शिवाजी माने, पराग अडकिणे, गोविंद लांडे आदी उपस्थित होते..श्री. ठाकरे म्हणाले, की आपण सत्तेसाठी नव्हे सत्यासाठी, शेतकऱ्यांसाठी फिरत आहोत. भाजपने सरदार पटेलांचे नाव घेऊ नये. सरदार पटेलांनी निझामाला वठणीवर आणले. निझामापेक्षा वाईट असलेल्या या सरकारला वठणीवर आणायचे असेल तर जात, धर्म बाजूला ठेवून सर्वांनी शेतकरी म्हणून एक व्हावे लागेल..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.