Amaravati News: शासनाने अतिवृष्टिग्रस्त शेतकऱ्यांसाठी मंजूर केलेला आर्थिक सहाय्याचा निधी अद्याप अनेक पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा न झाल्याने चांदूरबाजार तालुक्यात तीव्र संताप व्यक्त होत आहे. याच्या निषेधार्थ लोकविकास संघटनेच्या नेतृत्वाखाली शेकडो शेतकऱ्यांनी चांदूरबाजार तहसील कार्यालयावर हल्लाबोल आंदोलन केले..लोकविकास संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गोपाल भालेराव यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी तहसीलदारांची भेट घेऊन निधी वितरणातील विलंबाबाबत जाब विचारला. केवायसी व कागदपत्रांची पूर्तता करूनही मदत मिळत नसल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. .Flood Relief Fund: राज्य सहकारी बँकेकडून पूरग्रस्तांसाठी दहा कोटी.यावेळी गोपाल भालेराव यांनी प्रशासनाला थेट सवाल करत,“मंजूर निधी वेळेत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नसेल, तर त्याला जबाबदार कोण,” असा प्रश्न उपस्थित केला. लोकविकास संघटनेने तातडीने अतिवृष्टी मदत खात्यावर जमा करावी, अन्यथा आठ दिवसांत उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला..Farmer Relief Fund: नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना ४४ हजार कोटींचे पॅकेज दिले: अजित पवार.आंदोलनादरम्यान काही काळ तणाव निर्माण झाला होता. मात्र वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर आंदोलन शांततेत पार पडले. .या वेळी रमण लंगोटे, ऋषिकेश रडके, संविधान मोहोळ, श्रेयस बर्वे, जावेद पठाण, प्रवीण जामोदकर, विजय राऊत, शाम पारीसे, गौरव वैद्य, आशिष इंगळे यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी व लोकविकास संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.