Nanded News: गोदावरी नदीला आलेल्या पुरामुळे पाण्याच्या उसाव्यात अडकेलेल्या धर्माबाद तालुक्यातील दिग्रस येथील १६ तर चौंडी येथील पाच अशा २१ नागरिकांची राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या बचाव पथकाने सोमवारी (ता. २९) सुखरूप सुटका केली. .धर्माबाद तालुक्यातील गोदावरी नदी काठावरील अनेक गावांमध्ये बॅकवॉटरमुळे शेती पाण्याखाली गेली आहे. सोमवारी (ता. २९) दिग्रस व चौंडी या गावांतील नागरिक पुराच्या पाण्यात अडकले होते..Nanded Flood Rescue : पुरात अडकलेल्या ६६ नागरिकांना काढले बाहेर .या परिस्थितीची तत्काळ दखल घेत जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी राज्य आपत्ती प्रतिसाद दल, धुळे यांना तत्काळ धर्माबादकडे रवाना होण्याचे आदेश दिले. आदेशानुसार एसडीआरएफच्या बचाव पथकाने सोमवारी सकाळपासून धर्माबाद येथे उपस्थित राहून कार्यवाही केली..Nanded Flood Rescue : अठरा विद्यार्थ्यांसह शिक्षकांचा पुरातून थरारक बचाव.यात दिग्रस गावात पुरात अडकलेल्या दिव्यांग, वृद्ध तसेच केवळ दोन महिन्यांच्या बाळासह आई व इतर नागरिक मिळून सुमारे १६ पूरपीडितांची सुटका करण्यात यश आले. हे काम कमांडर प्रशांत राठोड, पोलिस निरीक्षक, राज्य आपत्ती प्रतिसाद दल तुकडी क्रमांक तीन यांच्या नेतृत्वाखाली.धर्माबादच्या उपविभागीय अधिकारी स्वाती दाभाडे व तहसीलदार सुरेखा स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले. याबरोबरच चौंडी गावातील पाच पूरपीडित नागरिकांनाही शोध व बचाव कार्य करून सुरक्षित बाहेर काढण्यात प्रशासनाला यश आले. दरम्यान, गोदावरी नदीच्या पाण्याची पातळी आणखी वाढण्याची शक्यता लक्षात घेता तालुक्यातील सर्व नागरिकांनी दक्ष राहावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.