Water Crisis: जळगाव जिल्ह्यासाठी महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या गिरणा नदीवरील गिरणा धरणातील जलसाठा घटत आहे. हा जलसाठा सध्या ४२ टक्क्यांपर्यंत असल्याची माहिती आहे. पुढे जूनमध्ये जलसाठा मोठ्या प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे..गिरणा धरण नाशिकमधील नांदगाव तालुक्यात आहे. जळगावातील चाळीसगाव व नांदगाव या तालुक्यांच्या सीमेजवळ हे धरण आहे. खानदेशातील सर्वात मोठे धरण म्हणून गिरणाची ओळख आहे. त्याची साठवण क्षमता १८ टीएमसी आहे. हे धरण भौगोलिकदृष्ट्या नाशिकमध्ये असले तरी त्याचा सर्वाधिक लाभ जळगाव जिल्ह्यास होतो. .Water Scarcity: वर्ध्यावर पाणीटंचाईचे सावट.जळगावातील चाळीसगाव, भडगाव, पाचोरा, धरणगाव, एरंडोल आदी भागांतील २१ हजार हेक्टरवरील रब्बी पिकांना याचा लाभ होत आहे. तसेच १०० गावांसह चाळीसगाव, पाचोरा, भडगाव शहरांच्या पाणी योजनाही गिरणा धरणावर अवलंबून आहेत.गिरणा धरण यंदाही १०० टक्के भरले होते. या धरणातून टंचाई निवारणार्थ जूनपर्यंत पाच वेळा नदीत पाणी सोडले जाणार आहे. .Water Storage Decline: उन्हाचा चटका वाढल्यामुळे झपाट्याने घटतोय पाणीसाठा.आतापर्यंत दोन वेळा धरणातून नदीत पाणी सोडण्यात आले आहे. यंदा धरणातील पाणी रब्बी, उद्योग व पिण्यासाठी राखीव ठेवण्यात आले आहे.मात्र, या महिन्यात गिरणा धरणातील जलसाठ्यात मोठी घट झाली आहे. पुढे पाऊस लांबल्यास जलसाठ्यात आणखी मोठी घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पाण्याचा काटेकोर व मर्यादित वापर करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे..नदीकाठीदेखील टंचाईगिरणा धरणातून यंदा टंचाई निवारणार्थ नदीत पाणी सोडण्यात आल्याने नदीकाठच्या भागात टंचाई कमी आहे. मात्र नदीत वाळूचोरी सुरू असल्याने पाण्याचा योग्य साठा होत नाही आणि पाणी वाहून जाते. त्यामुळे नदीकाठीदेखील टंचाई जाणवत असल्याचा मुद्दा शेतकरी उपस्थित करीत आहेत..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.