Irrigation Issue: येथील सटाणा-मालेगाव रस्त्यावर बुधवारी (ता. १) नारपार प्रकल्पाच्या मुद्द्यावरून शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतल्याचे पाहायला मिळाले.गारपीटग्रस्त शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी आलेले आमदार दिलीप बोरसे यांचा ताफा ब्राह्मणगावला अडवण्यात येऊन घेराव घालण्यात आला. .गिरणा डावा कालवा अस्तारीकरण व विस्तारीकरणाच्या कामास विरोध दर्शवत आराई, शेमळी, ब्राह्मणगाव, लखमापूर, यशवंत नगर आणि धांद्री येथील शेतकऱ्यांनी एकत्र येत आमदारांचा ताफा रोखला. या वेळी शेतकऱ्यांनी नारपार प्रकल्पाविरोधात जोरदार घोषणाबाजी करत आपली नाराजी व्यक्त केली. परिस्थितीची गंभीरता लक्षात घेऊन आमदार बोरसे यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला.. Farmer Demand: ‘नियमित कर्ज भरणारा शेतकरी कायम अन्यायाच्या छायेत’.शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही, ही पक्षाची आणि आमची ठाम भूमिका आहे, असे आश्वासन त्यांनी दिले. दरम्यान शेतकऱ्यांनी स्पष्ट इशारा देत सांगितले की, जर गिरणा डाव्या कालव्याचे विस्तारीकरण आणि अस्तारीकरण पुढे नेले गेले, तर येत्या काळात मोठ्या प्रमाणावर आंदोलन छेडले जाईल..Farmers Demand: हमीभावाचा कायदा त्वरित लागू करावा.शेतकरी आंदोलनाच्या तयारीतमुळातच गिरणा डावा कालव्याच्या पाण्यावर आधी शेतकऱ्यांचा हक्क आहे. या कालव्याचे अस्तरीकरण व विस्तारीकरण केले तर या भागातील शेती व्यवसाय संकटात येऊन शेतकरी, शेती व्यवस्था संकटात येऊन शेतकरी उद्ध्वस्त होईल, अशी भीती शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे. .सध्या या परिसरात शेतकऱ्यांमध्ये मोठी नाराजीचा सूर असून या प्रश्नाबद्दल लखमापूर, ब्राह्मणगाव, शेमळी, आराई, यशवंतनगर येथील शेतकरी आंदोलनाच्या तयारीत असून या बाबत लवकरच ब्राह्मणगाव येथे शेतकऱ्यांनी बैठक बोलावली आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.