Kharif Season: पावसाने प्रदीर्घ दडी मारल्याने गेवराई तालुक्यात खरीप पिकांची स्थिती गंभीर झाली आहे. काळेकुट्ट ढग दाटून येत असले, तरी पाऊस हुलकावणी देत आहे. कडक उन्हामुळे हजारो हेक्टरवरील उभी पिके करपू लागली असून, शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे..मृग नक्षत्र कोरडे गेल्यानंतर भुरभुर पावसावर शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या. मात्र, ऑगस्ट महिना कोरडा गेल्याने जमिनीतील ओलावा कमी झाला आहे..Jalgaon Rainfall Deficit: जळगावात पावसाअभावी पिके कोमेजण्याच्या मार्गावर.गेल्या तीन महिन्यांत नद्या-नाल्यांना पूर न आल्याने विहिरींनी तळ गाठला असून, अनेक बोअरवेल कोरडे पडले आहेत. त्यामुळे कोरडवाहू क्षेत्रातील पिकांची वाढ खुंटली आहे. बियाणे, खते आणि मजुरीवर केलेला खर्च वाया जाण्याची भीती शेतकऱ्यांना आहे..Urad Crop Damage: उडीद पिकाला फटका.तालुक्याच्या उत्तर भागाला गोदावरी नदी आणि पैठणच्या नाथसागराच्या उजव्या कालव्याचा आधार मिळत असल्याने जातेगाव, तलवडा, धोंडराई, मालेगाव आणि गेवराई शहर परिसरातील काही भागांत पिकांची स्थिती तुलनेने चांगली आहे..मात्र, चकलांबा, उमापूर, बंगाली पिंपळा, मादळमोही आणि सिरसदेवी परिसरातील कोरडवाहू पिके पावसाच्या खंडामुळे होरपळत आहेत..बागायती भागात पाणी उपलब्ध असले, तरी कपाशीला पाणी दिल्यानंतर फुलगळ वाढत असल्याचे शेतकरी राहुल कापसे यांनी सांगितले. त्यामुळे पिके वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू असून, दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.