Mumbai News : राज्यातील काजू उत्पादकांना प्रति किलो दहा रुपये याप्रमाणे देण्यात येणाऱ्या अनुदानाअंतर्गत सहा लाख ८३ हजार रुपयांचा निधी वितरित करण्यास सरकारने मान्यता दिली आहे. महाराष्ट्र आणि गोवा राज्यांतील काजू बी विक्रीतील फरक लक्षात घेऊन हे अनुदान जाहीर करण्यात आले..यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये या योजनेसाठी ९९ लाख ९४ हजार रुपयांची आर्थिक तरतूद केली आहे, त्यापैकी ३८ लाख ८८ हजार रुपयांचा निधी यापूर्वी वितरित केला आहे..Cashew Farming: नियोजनबद्ध काजू हंगामासाठी प्रयत्न.महाराष्ट्रामध्ये काजू पिकाखाली १.८१ लाख टन काजू उत्पादन घेतले जाते. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, कोल्हापूर, पालघर जिल्ह्यांमध्ये प्रामुख्याने काजूचे उत्पादन होते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला येथील काजूला ‘जीआय’ मानांकन देखील प्राप्त झाले आहे..Cashew Farming: जव्हार तालुक्याचे ‘काजू’ अर्थकारण.गोवा राज्यामध्ये काजूसाठी भावांतर योजना राबवली जाते, तशीच योजना राज्यामध्ये राबविण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत होती. त्यामुळे २०२४ मध्ये काजू बीसाठी वित्तीय अनुदान उपलब्ध करून देण्यात आले होते..त्याअंतर्गत प्रतिकिलो दहा रुपये याप्रमाणे किमान ५० किलो आणि कमाल २ हजार किलो या मर्यादेत अनुदान देण्यात येते. महाराष्ट्र राज्य काजू मंडळ नोडल एजन्सी म्हणून काम करत आहे. यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये या योजनेसाठी ९९ लाख ९४ हजार रुपयांच्या निधीची तरतूद केली आहे. यातील ३८ लाख ८८ हजार रुपयांचा निधी वितरित केला आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.