तापमानाच्याOrchard Management बाबतीत फळझाडे ही अत्यंत संवेदनशील असल्याने त्यावर जास्त उष्णता किंवा अति थंड तापमानाचा जास्त परिणाम होतो. हिवाळ्यात अति थंड हवामान, थंडीची लाट, धुके, थंड वारे आणि गारा यामुळे झाडांना इजा होते. वाढत्या थंडीत फळझाडांवर होणारा अनिष्ट परिणाम टाळण्यासाठी पूर्व दक्षतेचे व प्रत्यक्ष नियंत्रणाचे उपाय करणे अत्यंत आवश्यक आहे..सप्टेंबरच्या शेवटी पाऊस कमी झाला की ऑक्टोबरपासून राज्यात थंडीची चाहूल लागत असे. मात्र यावर्षी पावसाळा लांबला, शिवाय थंडीची तीव्रता देखील अचानक वाढल्याचे चित्र आहे. मात्र मागील पाच-सहा वर्षांपासून ऋतुचक्र प्रभावित झाले आहे. पावसाळा, हिवाळा आणि उन्हाळा हे तीनही ऋतू प्रभावित झाले आहेत. हवामान बदलामुळे पाऊस, थंडी आणि उष्णता यामध्ये अचानक चढ-उतार वाढलेले दिसून येत आहेत. अशी बदलती हवामान स्थिती पिकांसाठी धोकादायक ठरते. विशेषतः थंडीच्या तीव्रतेत वाढ झाल्यानंतर फळझाडांवर विपरीत परिणाम होण्यास सुरुवात होते..Mango Orchard Management: वाढीच्या अवस्थेत आंबा बागेचे व्यवस्थापन.फळझाडांच्या लागवडीसाठी अनुकूल जमीन आणि हवामान या बाबी अत्यंत आवश्यक असतात. हवामानामध्ये उष्णतामान, प्रकाश, आर्द्रता, पाऊस, धुके, गारा व वारा या बाबींचा समावेश होतो. विशिष्ट हवामानात विशिष्ट फळझाडे चांगली वाढतात. त्यासाठी स्थानिक हवामान लक्षात घेऊन त्यानुसार लागवडीसाठी फळझाडांची निवड करणे आवश्यक असते..कोणत्याही पिकाच्या योग्य वाढीसाठी आणि उत्पादनासाठी कमाल आणि किमान तापमानाची आवश्यकता असते. ठराविक तापमानात झालेली वाढ किंवा घसरण ही झाडांच्या वाढीवर परिणाम होऊन उत्पादनात घट येते. तापमानाच्या बाबतीत फळझाडे ही अत्यंत संवेदनशील असल्याने त्यावर जास्त उष्णता किंवा अति थंड तापमानाचा जास्त परिणाम होतो. हिवाळ्यात अति थंड हवामान, थंडीची लाट, धुके, थंड वारे आणि गारा यामुळे झाडांना इजा होते. अशा प्रतिकूल शीत लहरींमुळे फळझाडांचे नुकसान होते..Mango Orchard Management: अतिपावसाच्या स्थितीत आंबा बागेचे व्यवस्थापन.द्राक्ष, केळी, आंबा, डाळिंब आदी फळपिकांवर अति थंडीचा जास्त परिणाम होतो. वाढत्या थंडीत पिकांना जमिनीतून अन्नद्रव्ये घेण्यास अडचणी येतात. परिणामी पिकाची वाढ खुंटते. केळी पिकात करपा रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असते. द्राक्षात मण्याची वाढ थांबते, मणी तडकतात. आंबा पिकात नर फुलांचे प्रमाण वाढते. डाळिंबात फूलगळ होते. संभाव्य नुकसान लक्षात घेऊन फळझाडांचे थंडीपासून संरक्षण करणे अत्यंत आवश्यक असते. हिवाळ्यामध्ये तापमान १० अंश सेल्सिअसपेक्षा कमी झाल्यानंतर तरी फळझाडांवर होणारा परिणाम टाळण्यासाठी हिवाळ्यात फळबागांची विशेष काळजी घ्यायला हवी. त्यासाठी योग्य उपाययोजनांचा अवलंब करणे अत्यंत आवश्यक आहे..कमी झालेल्या तापमानाचे होणारे परिणामझाडांची वाढ मंदावते.जमिनीचे तापमान कमी होते.वनस्पतींच्या पेशी मरतात.फळपिकांमध्ये फळे तडकतात. प्रामुख्याने द्राक्षे, केळी, डाळिंब, बोर, अंजीर, पपई इत्यादी फळपिकांना हे प्रमाण जास्त असते.अशा फळांना योग्य बाजारभाव मिळत नाही.केळी पिकांमध्ये घड बाहेर पडत नाही.रस शोषणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव वाढतो.रोग आणि किडींचा प्रादुर्भाव वाढतो..Orchard Nutrient Management : फळपिकांसाठी एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन महत्त्वाचे.पिकावर होणारा परिणामशीत हवामानामुळे फुले, फळे, पाने, खोड आणि मुळ्या यावर प्रतिकूल परिणाम होतो. अतिशीत हवामानात वनस्पतीमधील पेशी मरतात.अतिशीत तापमानामुळे खोड आणि फांद्या यांच्या आतील भाग काळा पडतो आणि ठिसूळ बनतो.रोपवाटिकेतील कोवळी फळझाडे यास बळी पडतात. कोवळी पाने, फूट आणि फांद्या सुकतात. झाडांना इजा पोचते. खोडाच्या सालीला इजा होऊन साल फाटते. काहीवेळा ही इजा मुळांपर्यंत पोचते. अशावेळी सालीचा इजा झालेला भाग खरडून त्या जखमेला बोर्डोपेस्ट लावावी. जेणेकरून त्या जखमेतून बुरशीचा होणारा शिरकाव रोखला जाईल..उष्ण हवामानात वाढणाऱ्या फळझाडांच्या मोहराला शीत लहरीमुळे जास्त नुकसान पोचते. आंब्याचा मोहोर जळतो.सदाहरित झाडे ही पानगळ होणाऱ्या झाडांपेक्षा लवकर आणि जास्त नाजूक असून ती थंडीच्या दुष्परिणामास बळी पडतात.तापमान २ अंश सेल्सिअसच्या खाली गेल्यास पपईची वाढ थांबते. फळांची प्रत बिघडते. जास्त थंडीमुळे झाडे मरतात.तापमान ४ ते ५ अंश सेल्सिअसच्या खाली गेले तर केळी झाडांची वाढ मंदावते. पाने पिवळी पडतात, केळफूल बाहेर पडत नाही. फळांना चिरा पडतात.द्राक्ष वेलीच्या वाढीच्या आणि फुलोऱ्याच्या काळात कडक थंडीचा विपरीत परिणाम होतो. मणी गळतात, मण्यांची प्रत खराब होते. द्राक्षाची कोवळी फूट, पाने आणि मणी यांची नासाडी होते.संत्रा, मोसंबी बागेत तापमान १० अंश सेल्सिअसच्या खाली गेल्यास झाडाची वाढ थांबते, फलधारणा होत नाही.डाळिंब व लिंबू फळांची साल तडकते..Orange Orchard Management : संत्रा बागांमध्ये बहरासाठी योग्य व्यवस्थापन आवश्यक.महत्त्वाच्या टिप्सपहाटेच्या वेळी बागेत धूर करावा.बागेस रात्रीच्या वेळी सिंचन करावे.सिंचनासाठी शक्यतो विहिरीचे पाणी वापरावे.फळझाडांच्या खोडांना बोर्डो पेस्ट लावावी.फळझाडाच्या खोडाभोवती, आळ्यात गवत,कडबा, पालापाचोळा, गव्हाचे तूस यांचे आवरण घालावे.पिकास पालाशयुक्त खते द्यावीत.नवीन रोपे, कलमांच्या बुंध्यात आच्छादन करावे..पूर्वदक्षतेचे उपायथंडी, उष्णतामान आणि वारा यांच्यापासून फळबागांचे संरक्षण करण्याकरिता वारा वाहण्याच्या दिशेने वारा प्रतिबंधक झाडांची (सुरु, बोगनवेल, बांबू, घायपात, मलबेरी, शेवगा, शेवरी, खडसरणी, पांगारा, ग्लिरिसिडीया इ.) लागवड करावी.बागेच्या भोवती मध्यम उंच कुंपण घालून शेवरी, मेंदी, चिलार, कोयनेल, एरंडी, घायपात इ. झाडे लावून नियमित छाटणी करावी.मुख्य फळझाडे लहान असल्यास दोन झाडांतील मोकळ्या जागेत दाट पसरणारी आंतरपिके घ्यावीत. उदा. हरभरा, वाटणा, घेवडा, पानकोबी, फुलकोबी, मूग, मटकी इ.केळी, पपई व पानवेलीच्या भोवती दाट शेवरी लावावी.केळी लागवड करताना केळफूल कडाक्याच्या थंडीत बाहेर पडणार नाही अशी दक्षता घेऊनच करावी..प्रत्यक्ष नियंत्रणाचे उपायविविध वर्तमानपत्रे, आकाशवाणी, दूरदर्शन इ. प्रसार माध्यमातून हवामानविषयक माहिती नियमित दिली जाते. कडक थंडी किंवा थंडीची लाट येणार याची सूचना मिळाल्यास खालील उपाययोजना कराव्यात.फळझाडांच्या ओळीत किंवा बांधावर पहाटेच्या वेळी मध्यम ओलसर पालापाचोळा पेटवून धूर करावा. त्यात दगडी कोळसा, जुन्या वस्तू, टायर, ओली लाकडे टाकून रात्रभर धूर व उष्णता मिळेल असे पाहावे.बागेस रात्रीच्या वेळी सिंचन करावे. यामुळे जमिनीचे तापमान वाढते व पर्यायाने बागेतील तापमान वाढीस मदत होते.थंडीची लाट येणार हे लक्षात येताच सायंकाळी वेळी फळझाडांना विहिरीचे हलके पाणी द्यावे. विहिरीच्या पाण्याचे तापमान कालव्याच्या पाण्यापेक्षा थोडे जास्त असते. या पाण्याने सिंचन केल्यास ओली जमीन लवकर थंड होत नाही..झाडांच्या खोडापाशी व आळ्यात गवत, कडबा पाचोळा, गव्हाचे तूस इ. आवरण घालावे.केळीच्या बागेस रात्रीच्या वेळेस पाणी द्यावे. प्रति झाड म्युरेट ऑफ पोटॅश १०० ग्रॅम प्रमाणे द्यावे. केळीच्या घडाभोवती व खोडाभोवती त्याच झाडांची पाने गुंडाळावीत.रोपवाटिकेतील रोपे, कलमे, रोपांचे वाफे यावर रात्री आच्छादन घालावे व सकाळी ते काढावे. त्यासाठी तुराटी, कडबा यांचे तट्टे, काळे प्लास्टिक, पोती यांचा उपयोग करावा.पालाशयुक्त वरखते किंवा राख खत म्हणून दिल्यास झाडांची पाणी व अन्नद्रव्ये शोषणाची आणि वहनाची क्षमता वाढून पेशींचा काटकपणा वाढतो. - डॉ. आदिनाथ ताकटे ९४०४०३२३८९(कोरडवाहू शेती संशोधन केंद्र, सोलापूर).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.