Sugarcane Farmers: कोल्हापूर विभागातील साखर कारखान्यांनी २०२५-२६ च्या चालू हंगामातील सुमारे ६५० कोटी रुपयांची एफआरपी अद्याप थकीत ठेवल्याने ऊस उत्पादक शेतकरी आक्रमक झाले आहेत..मार्चअखेर पीक कर्जाच्या परतफेडीची मुदत जवळ आली असताना, हातात पैसे नसल्याने शेतकऱ्यांसमोर मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे. या प्रकरणी संबंधित कारखान्यांवर तातडीने जप्तीची कारवाई करून व्याजासह थकबाकी द्यावी, अशी मागणी शेतकरी संघटनांनी केली आहे..Sugarcane FRP Dues : थकित एफआरपीबाबत १५ डिसेंबरपर्यंत तोडगा काढा.कोल्हापूर जिल्हा हा साखर कारखानदारीचा बालेकिल्ला मानला जातो. मात्र, यंदा कारखान्यांनी वेळेत बिले न दिल्याने शेतीचे गणित कोलमडले आहे. मार्च महिना संपायला अवघे काही दिवस शिल्लक असताना ६५० कोटी रुपये कारखान्यांकडे अडकून पडले आहेत..मार्चअखेरपर्यंत पीक कर्ज न फेडल्यास शेतकऱ्यांना ‘डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजने’रचा लाभ मिळण्यात अडचणी येणार आहेत. वेळेत कर्जफेड न झाल्यास शेतकऱ्यांना व्याजाचा मोठा भुर्दंड सहन करावा लागणार असल्याने संताप व्यक्त होत आहे..Sugarcane FRP Dues : सोलापूर जिल्ह्यात ४२ कोटी रुपये ‘एफआरपी’ थकित.जय शिवराय संघटनेचे अध्यक्ष शिवाजीराव माने म्हणाले, की उसाचे गाळप झाल्यानंतर १४ दिवसांच्या आत एफआरपीचे पैसे मिळणे बंधनकारक आहे. मात्र, अनेक कारखान्यांनी या नियमाचे उल्लंघन केले आहे. थकबाकीदार कारखान्यांवर साखर आयुक्तांनी तातडीने ‘आरआरसी’ अंतर्गत कारवाई करून साखर साठा जप्त करावा आणि शेतकऱ्यांचे पैसे वसूल करावेत, अशी मागणी जोर धरत आहे..केवळ चालू हंगामातीलच नव्हे, तर मागील २०२४-२५ या हंगामातील एफआरपीची रक्कमही व्याजासह मिळावी, अशी आग्रही मागणी आम्ही करत आहोत. येत्या काही दिवसांत थकबाकी न मिळाल्यास कारखान्यांच्या दारात आणि साखर आयुक्त कार्यालयावर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा विविध शेतकरी संघटनांच्या नेत्यांनी दिला आहे.