Solapur News: रेशनधान्य दुकानांमधून अंत्योदय व प्राधान्यक्रम कुटुंबातील लाभार्थींना दरमहा पाच किलो धान्य मोफत मिळते. तरीपण, सोलापूर शहर- जिल्ह्यातील २२ हजार ८०० लाभार्थींनी सहा ते १२ महिने झाले धान्यच घेतलेले नाही. त्यांची शहरात पुरवठा निरीक्षक आणि ग्रामीणमध्ये तलाठ्यांमार्फत मिशन सुधार पडताळणी झाली. या लाभार्थींपैकी अनेकांची आर्थिक स्थिती सुधारल्याने त्यांना रेशनधान्याची गरज नाही, काहीजण स्थलांतरित झाले तर काहीजण मयत आहेत. त्यामुळे त्यांचा लाभ आता कायमचाच बंद होणार आहे..रेशनकार्डसाठी ज्यावेळी आधारकार्ड जोडण्याची अट घालण्यात आली, त्यावेळी रेशनधान्य दुकानदारांनी अंदाजे जन्मतारखा टाकल्या होत्या. त्या व्यक्तींचे वय आता १०० पेक्षा जास्त दिसत आहे. विशेष म्हणजे, १०० वर्षांनंतरही १०२ जण नियमित धान्य उचलतात, अशी माहिती पुरवठा विभागाच्या संकेतस्थळावर दिसते. दुसरीकडे वयाचे १८ वर्षे सुद्धा पूर्ण नाहीत, तरीदेखील ९८ चिमुकली कुटुंबप्रमुख असल्याचेही संकेतस्थळावर दिसत आहे. .Free Ration Scheme : मोफत गहू, तांदळासोबत मिळणार बाजरी ; युपी सरकारचा निर्णय.तसेच साडेतीन हजारांहून अधिक जणांची नोंद एकापेक्षा जास्त तालुक्यात, जिल्ह्यात दिसत आहे. याशिवाय काही लाभार्थी स्थलांतरित झाल्याने त्यांच्या आधारकार्डवरील पत्ते बदललेले दिसतात. अशा सर्वांची पडताळणी करून त्यांचे धान्य बंद केले जात आहे. सोलापूर शहर-जिल्ह्यातील चार हजारांहून अधिक लाभार्थींचे मागील सहा महिन्यांपूर्वी रेशनचे धान्य बंद करण्यात आले आहे. आता पुन्हा २२ हजारांहून अधिक लाभार्थींचे धान्य बंद होणार आहे..प्रति माणशी ५ किलो धान्य मोफतअंत्योदय व प्राधान्यक्रम कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला दरमहा शासनाच्या वतीने ५ किलो धान्य मोफत दिले जाते. त्यात तीन किलो गहू व दोन किलो तांदूळ आहे. रेशन दुकानांमधून धान्य मोफत मिळत असताना देखील अनेकांनी सहा ते १२ महिने झाले तरी रेशनधान्य दुकानांमधून धान्यच घेतलेले नाही..Free Ration Scheme: देशातील ८१.३५ कोटी लाभार्थ्यांना मोफत अन्नधान्य.जिल्ह्यातील रेशन कार्डधारकांची स्थिती१०० वर्षांवरील कुटुंबप्रमुख १०२१८ वर्षांखालील कुटुंबप्रमुख ९८संशयित आधार कार्ड ४,७००६ ते १२ महिने धान्य न घेतलेले १३,८००एकापेक्षा जास्त रेशन कार्ड ४,३०.राज्य शासनातर्फे ‘मिशन सुधार’ राबविले जात आहे. त्यात पूर्वी ज्या कुटुंबप्रमुखांचे वय अंदाजे टाकले त्यांची दुरुस्ती, आधारकार्डवरील चुकीच्या माहितीची पडताळणी, सहा ते १२ महिन्यांपासून धान्य न घेणाऱ्यांची चौकशी आणि एकाच व्यक्तीची एकापेक्षा जास्त रेशनकार्ड असलेल्यांची पडताळणी केली जात आहे. त्यानुसार अपात्र लाभार्थींचे धान्य बंद केले जात आहे.- ओंकार पडोळे, अन्नधान्य वितरण अधिकारी, सोलापूर शहर.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.