Kolhapur News : कृषिपंप ग्राहकांच्या अडचणी लक्षात घेत शासनाने मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना आणली आहे. ७.५ अश्वशक्ती किंवा त्यापेक्षा कमी भार असलेले शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकतात. .मात्र वीज बिलात चुकीचा किंवा वाढीव भार नोंद झाल्याने जिल्ह्यातील अनेक शेतकरी या योजनेपासून वंचित होते. आता या सर्व बिलांची पुन्हा तपासणी करण्यात येणार आहे. .Agriculture Electricity : शेतीपंपासाठी सिंगल फेज वीजपुरवठा वापरू नये.याबाबतच्या तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठीच्या सूचना महावितरणच्या संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री प्रकाश आबीटकर यांनी दिली . योजनेच्या पुनर्सर्वेक्षणातून कोल्हापूर सांगली जिल्ह्यातील सुमारे दहा हजार शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे. .Agriculture Electricity : खंडित वीजपुरवठ्याने शेतकरी त्रस्त.कोल्हापूर सांगली जिल्ह्यामधील काही कृषी ग्राहकांकडून प्रत्यक्षात जागेवर कृषीपंप क्षमता ७.५ अश्वशक्ती किंवा त्यापेक्षा कमी वापर असलेल्या परंतु वीज देयकावर ७.५, ८, ८.५ ते ९.०० अश्वशक्ती असा भार उल्लेख असलेबाबत व त्यामुळे ‘मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेचा’ लाभ मिळत नसल्याच्या तक्रारी प्राप्त झालेल्या होत्या..या तक्रारीच्या अनुषंगाने स्थानिक कार्यालयांना संबंधित कृषीपंपांची स्थळ तपासणी करून आवश्यक ती दुरुस्ती करण्याबाबत सूचना करण्यात आल्या होत्या. त्यास अनुसरून प्राप्त प्राथमिक अहवाल योग्य त्या माहितीसाठी मुख्य कार्यालयास सादर करणेत आला होता. यानुसार आता दुरुस्त्या सुरू आहेत..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.