Policy Change: अन्नप्रक्रिया उद्योगातील शेतकरी, शेतकरी उत्पादक कंपन्या, तसेच उद्योजकांना आता परवान्याचे दरवर्षी नूतनीकरण करावे लागणार नाही. नूतनीकरणाची अट रद्द करीत एकदा दिलेला परवाना कायमस्वरूपी वैध ठेवण्याचा निर्णय केंद्राने घेतला आहे. .भारतीय अन्न सुरक्षा व मानक प्राधिकरणाने (एफएसएसएआय) बुधवारपासून (ता.१) नवे नियम लागू केले असून ते सुटसुटीत आहेत. वार्षिक परवाना नूतनीकरणासाठी पुन्हा अर्ज करण्याची किंवा शुल्क भरण्याची गरज नसेल. यामुळे शेतकऱ्यांचा वेळ आणि पैसा वाचणार आहे. वार्षिक दीड कोटी रुपयांपर्यंत उलाढाल असलेले शेतकरी उत्पादक गट किंवा उद्योजक केवळ नोंदणी करून आपला व्यवसाय करू शकतील..Food Processing Industry: अन्न प्रक्रिया उद्योगात राज्याची आघाडी कायम.सध्या ‘राज्य परवाना’ श्रेणीत असलेले शेतकरी, उद्योजक कमी उलाढालीमुळे नोंदणी श्रेणीत येत असल्यास त्यांनी भरलेले जादा शुल्क नवीन नोंदणी शुल्कात समाविष्ट केले जाईल. स्थलांतर करण्यासाठी अतिरिक्त शुल्क आकारण्यात येणार नसून परवाना क्रमांक तोच राहणार आहे..Food Processing: भारताच्या अन्नप्रक्रिया बाजारपेठेला विस्ताराचे वेध.अर्थात, परवाना कायमस्वरूपी असला तरी अन्न सुरक्षा, स्वच्छता आणि गुणवत्ता राखणे सर्व घटकांसाठी बंधनकारक असेल, असे प्राधिकरणाने नमूद केले आहे..सतत तपासणीला अटकावसूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अन्न सुरक्षा व स्वच्छतेचे नियम पाळणाऱ्या शेतकरी, उद्योजकांकडे आता सतत तपासणी केली जाणार नाही. या नव्या नियमांमुळे आता देशातील ९८ टक्के अन्न व्यवसाय राज्य शासनाच्या कक्षेत येतील. यामुळे स्थानिक पातळीवर शेतकऱ्यांना समस्या मांडणे सोयीचे होणार आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.