Solapur News : अतिवृष्टीसह पुरामुळे जिल्ह्यातील हजारो हेक्टर ऊस पाण्याखाली गेला आहे. आता पूर ओसरल्यानंतर विदारक चित्र समोर आले आहे. उसाचे चिपाड झाले आहे. .परिणामी उसाच्या उत्पन्नात घट होणार आहे. मात्र योग्य व्यवस्थापन केल्यास शिल्लक राहिलेल्या उसाचे होणारे नुकसान टाळण्यास मदत होणार आहे..Solapur Flood : घराच्या नुकसानीची बुधवारपासून मदत.जिल्ह्यात दोन लाख हेक्टरहून अधिक क्षेत्रावर ऊसपीक आहे. यंदा एक नोव्हेंबरपासून ऊस गाळप हंगामाला सुरुवात होणार आहे. मात्र, अतिवृष्टी व भीमा, सीना, भोगावती, बोरी आदी नद्यांना आलेल्या पुरामुळे नद्यांच्या काठावरील गाळपासाठी तयार हजारो हेक्टर ऊस पाण्याखाली गेला. अनेकदा दोन-चार दिवसांपर्यंत ऊस पाण्याखाली राहिल्याने जळाला आहे..Solapur Flood: अतिवृष्टीमुळे बाधित ९५ गावांपैकी ७४ गावांचा वीजपुरवठा सुरळीत.शेतात साचलेल्या पाण्यामुळे व पुरामुळे ऊस पाण्याखाली राहिल्यास त्यावर प्रतिकूल परिणाम होतो. ऊस पिकामध्ये विविध समस्या निर्माण होऊन मोठे नुकसान होते. अशा स्थितीत अतिवृष्टीग्रस्त व पूरग्रस्त भागातील ऊस पिकामध्ये उपाययोजना करून नुकसान टाळता येते..पुराच्या पाण्याचा उसावरील परिणामपाणी साचल्यामुळे झाडांची वाढ कमी होते, पानांचे क्षेत्र कमी होते.जास्त पाणी साचल्याने पाने पिवळी पडतात, झाडांची वाढ खुंटते.फुटवे मरण्याच्या प्रमाणात वाढ, म्हणजेच नवीन कोंब फुटत नाहीत.पाणी साचल्यामुळे एकूण उत्पादन १५ ते ४५ टक्क्यांपर्यंत कमी होते.जमिनीत ऑक्सिजनची कमतरता निर्माण होते, झाडाच्या आरोग्यावर परिणाम. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.