Solapur News : जिल्ह्यातील शुगरबेल्ट म्हणून ओळख असलेल्या नदीकाठच्या उसाला महापुराचा मोठा फटका बसला. उभा ऊस महापुरात आडवा झाला. आडव्या झालेल्या उसाला अतिवृष्टी व महापुरातील मदतीसाठी निकष आडवे आल्याचे समजते. आडवा झालेला ऊस गाळपासाठी प्राधान्याने नेण्याकरिता आता त्या-त्या भागातील साखर कारखानदारांची सहानुभूतीच शेतकऱ्यांच्या मदतीला येणार आहे. .जिल्ह्यातील सीना, भोगावती, नागझरी, बोरी, अदिला या नद्यांसह इतर मोठ्या ओढ्यांना सप्टेंबरमध्ये प्रचंड महापूर आला होता. महापुराच्या प्रवाहात उसाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे समोर आले आहे. जिल्ह्यातील ४० हून अधिक साखर कारखानदारांना शुगर बेल्ट म्हणून सीना नदीकाठचा मोठा लाभ आतापर्यंत झाला आहे. .Rain Crop Damage : अतिवृष्टीमुळे भाजीपाला उत्पादक संकटात .करमाळा, माढा, मोहोळ, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापू्र, अक्कलकोट व बार्शी तालुक्यातील नदीकाठच्या उसाचे महापुराने मोठे नुकसान केले आहे. अतिवृष्टीत उसाचे नुकसान होत नसल्याचे प्रशासकीय पातळीवर व लोकप्रतिनिधींच्या पातळीवर मत झाल्याचे समजते. त्यामुळे भरपाईसाठी फक्त नदीकाठच्या उसाचा समावेश केल्याचे समजते. नदीकाठचाही नव्या लागणीचा लहान ऊस घेतला असल्याचे समजते..राज्यातील साखर कारखान्यांचा गळीत हंगाम १ नोव्हेंबरपासून सुरू करण्यास सरकारने परवानगी दिली आहे. जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा हंगाम नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. महापुरात आडवा झालेला ऊस कारखान्यांनी प्रथम प्राधान्याने गाळपासाठी घेतला तरीही आडवा झालेला ऊस तब्बल एक महिना शेतकऱ्यांना सांभाळावा लागणार आहे. शेतकऱ्यांपुढे हे मोठे आव्हान महापुरानंतर उभा राहिले आहे. यंदाच्या गळीत हंगामासाठी जिल्ह्यात दोन लाख हेक्टरच्या आसपास ऊस उपलब्ध आहे..Rain Crop Damage : अतिवृष्टीमुळे ३ लाख हेक्टरवरील पिके बाधित.‘जीआर’नंतर स्पष्ट होणार उसाची भरपाईशासनाकडून अतिवृष्टी व महापूरग्रस्तांच्या मदतीसाठी शासन निर्णय झाल्यानंतरच जिल्ह्यातील किती ऊस उत्पादकांना भरपाई दिली आहे? याचे आकडे समोर येण्याची शक्यता आहे. सध्या प्रशासनाने जिल्ह्यातील ५० हजार हेक्टरवरील उसाचा भरपाईसाठी समावेश केल्याचे समजते. त्यातील ४० हजार हेक्टर नव्या लागणीचा ऊस तर दहा हजार हेक्टरवरील जुना (मोठा) ऊस असल्याचे समजते. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना शासनाने काय दिले? याचे उत्तर ‘जीआर’ आल्यावरच मिळणार आहे..महापुराच्या पाण्याने आमची शेती उद्ध्वस्त केली. उसावरून नदीचे पाणी वाहून गेले. पाण्यासोबत आलेली माती उसाच्या पानांमध्ये बसली, यामुळे ऊस सडून गेला. कारखाना तर घेऊन जाणार नाही, पण जनावराला सुद्धा याचा वापर होणार नाही. उत्पन्न हातातून गेले, शेतातून ऊस काढण्यासाठी येणारा खर्च आता वेगळाच.- भारत गुंड, शेतकरी, शिवणी (ता. उ. सोलापूर).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.