Sangli News: सांगली जिल्ह्यातील ५ हजार २७९ शेतकऱ्यांनी पुनर्रचित हवामान आधारित अंबिया बहरातील केळी, आंबा, डाळिंब आणि द्राक्ष पिकासाठी विमा योजनेत सहभाही होण्यासाठी अर्ज केले आहेत. कृषी विभागाने जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी विमा योजनेत सहभागी होण्यासाठी गावोगावी जनजागृती केली असली, तरी शेतकऱ्यांनी पीकविम्याला कमी प्रतिसाद दिला असल्याचे चित्र आहे..जिल्ह्यात यंदाच्या पुनर्रचित हवामान आधारित अंबिया बहरातील फळ पीकविमा योजनेत सहभागी होण्याचे आवाहन कृषी विभागाने शेतकऱ्यांना केले आहे. त्यानुसार द्राक्ष, डाळिंब, केळी आणि आंबा या पिकांचा विमा घेऊन पिकाला संरक्षण देण्यासाठी योजनेत सहभागी होण्यसाठी अर्जही केले आहेत. .अतिवृष्टी, पावसाचा खंड, यासह नैसर्गिक आपत्तीमुळे फळ बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी या योजनेत सहभाग घेतला तर, त्यांना नुकसान भरपाई मिळण्यास मदत होते..जिल्ह्यातील ५ हजार २७९ शेतकऱ्यांनी फळ पीकविमा घेत २ हजार ६४९ हेक्टरवरील पिकांना संरक्षित केले आहे. .Fruit Crop Insurance: फळपीक विमा नोंदणीस मुदतवाढ.तर आटपाडी तालुक्यात सर्वांत कमी शेतकऱ्यांनी विमा घेऊन बागेला संरक्षण दिले आहे. कृषी विभागाने या योजनेत सर्वाधिक शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, यासाठी गावोगावी जनजागृतीही केली आहे..Fruit Crop Insurance: केळी, आंब्याला हवामान आधारित विमा परतावा मंजूर.कृषी विभागाने या योजनेत सर्वाधिक शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, यासाठी गावोगावी जनजागृतीही केली आहे..विमा योजनेचे महत्त्वही शेतकऱ्यांना पटवून दिले आहे. मात्र, अशापरिस्थितीही शेतकऱ्यांनी पीकविमाघेण्याला कमी प्रतिसाद दिला असल्याचे चित्र आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.