Palghar News: डहाणू तालुक्यात सूर्या नदीवर एमएमआरडीएने तीन वर्षांपूर्वी सुमारे ५० कोटी रुपये खर्चून उभारलेल्या कोकण पद्धतीच्या पाच बंधाऱ्यांमुळे जलसंधारणाला मोठा हातभार लागला आहे. त्यामुळे उन्हाळी पिकांना मोठा दिलासा मिळत आहे; मात्र डिसेंबर महिना उजाडला तरी या बंधाऱ्यांमध्ये पाणी अडवण्याची प्रक्रिया सुरू न झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे..घोळ, आंबिवली, उर्से आणि चिंचारे परिसरात बांधलेल्या या बंधाऱ्यांमुळे कालव्याचे पाणी न पोहोचणारे डहाणू तालुक्यातील अनेक भाग लाभाच्या क्षेत्रात आले आहेत. वाढलेल्या जलस्तरामुळे उन्हाळी भातशेती, पालेभाज्या आणि भाजीपाला लागवडीची संधी शेतकऱ्यांना मिळाली आहे. घोळ बंधाऱ्यात ०.१६२ दशलक्ष घनमीटर जलसाठा उपलब्ध होत .PM Surya Ghar Yojana: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक हजार घरांवर सौरसंच.असल्याने शेतीचा विस्तार वाढला आहे. उत्पन्नात वाढ झाल्यामुळे रोजगारासाठी स्थलांतर करणाऱ्या कुटुंबांची संख्याही कमी झाली आहे. त्याचप्रमाणे पिण्याच्यापाण्याची समस्यादेखील लक्षणीयरीत्या कमी झाली आहे.यावर्षी पाणी अडवण्यास विलंब झाल्यामुळे, नदीतील पाण्याचा मोठा प्रवाह थेट समुद्राकडे वाहून जात आहे, असे स्थानिकांनी सांगितले..Surya River Bridge : जीवघेणा प्रवास संपता संपेना.ऑक्टोबर महिन्यातच हे बंधारे कार्यान्वित झाल्यास पाण्याचा अधिक साठा करणे शक्य होते, असे जलसंधारण तज्ज्ञांचे मत आहे. प्रशासनाच्या या उदासीनतेमुळे शासनाच्या मोठ्या गुंतवणुकीचा उद्देश पूर्ण होतनसल्याची तक्रार शेतकरी करत आहेत..या गंभीर समस्येकडे त्वरित लक्ष देऊन जलसंपदा विभागाने तातडीने बंधाऱ्यांमध्ये पाणीअडवण्याची व्यवस्था करावी. या व्यवस्थापनात होणारा प्रत्येक दिवसाचा विलंब हा शेतकऱ्यांच्या भविष्यातील पिकांसाठी मोठे नुकसानदायक ठरू शकतो. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.