Pune News: मानवी हस्तक्षेपामुळे निसर्गाचा समतोल बिघडत चालला असून, त्याचा फटका पशुपक्ष्यांना बसत आहे. अशा परिस्थितीत पुरंदर तालुक्यातील दिवे परिसरात मात्र पक्ष्यांचा किलबिलाट पुन्हा ऐकू येत असून, त्यामागे काळेवाडी येथील शेतकरी दांपत्याचा संवेदनशील निर्णय कारणीभूत ठरत आहे..काळेवाडी (ता. पुरंदर) येथील शेतकरी सागर काळे व वृषाली काळे यांनी उन्हाळ्यात पशुपक्ष्यांना अन्न-पाण्याची कमतरता भासू नये, यासाठी स्वतःच्या शेतातील पाच एकर ज्वारीचे पीक काढणीस न घेता पक्ष्यांसाठी खुले ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयामुळे परिसरातील हजारो चिमण्या व इतर पक्षी या ज्वारीवर ताव मारताना दिसत आहेत..Digital Bird Protection: पाखरे राखण्याच्या कामात शेतकरी झाला ‘डिजिटल’ .काळे कुटुंबाची शेती मल्हारगड परिसरात असून, या वर्षी समाधानकारक पावसामुळे परिसर हिरवाईने नटला आहे. वनराईमुळे येथे विविध पशुपक्ष्यांचा वावर असतो. मात्र तीव्र उन्हाळ्यात अन्नटंचाई निर्माण होऊ शकते, हे ओळखून काळे दांपत्याने सामाजिक बांधिलकी जपत हा निर्णय घेतला..या उपक्रमाला वडील पंढरीनाथ काळे यांचीही संपूर्ण साथ लाभली. सध्या जवळ जवळ पाच एकर क्षेत्रावरील ज्वारीची कोणतीही राखण न करता पाखरांना न हुसकावण्याचा निर्णय घेतल्याने पशुपक्षी थव्याथव्याने येथे पाहायला मिळत आहेत. काळे दांपत्याच्या या निसर्गपूरक व आदर्श उपक्रमाचे परिसरात मोठ्या प्रमाणावर कौतुक होत असून, इतर शेतकऱ्यांसाठीही हा उपक्रम प्रेरणादायी ठरत आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.