Baglan News: रब्बी हंगाम २०२५-२६ च्या पहिल्या आवर्तनास गुरुवारी (ता.२२) पहाटे ६ वाजता हरणबारी मध्यम प्रकल्पातून सुरुवात करण्यात आली. यानुसार ३०० क्युसेक क्षमतेने पाणी मोसम नदीपात्रात सोडण्यात असून हे आवर्तन पुढील दहा दिवस सुरू राहणार असल्याची माहिती पाटबंधारे विभागाने दिली आहे. .त्यामुळे लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या रब्बी पिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. सद्यःस्थितीत गहू, हरभरा, कांदा, भाजीपाला आदी रब्बी पिके वाढीच्या अवस्थेत असून या आवर्तनामुळे पिकांच्या वाढीस आवश्यक सिंचन मिळणार आहे..Harnabari Dam : हरणबारी उजव्या कालव्यासाठी निधी मंजूर .पाण्याअभावी अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना या आवर्तनाचा मोठा फायदा होणार असल्याने शेतकरी वर्गात समाधान व्यक्त केले जात आहे. दरम्यान, मोसम नदीपात्रालगत राहणाऱ्या नागरिकांनी व जनावरांसह नदीकाठावर वावर करणाऱ्यांनी योग्य ती दक्षता घ्यावी, असे आवाहन जलसंपदा विभागाच्या वतीने करण्यात आले आहे..हरणबारी प्रकल्पांतर्गत सर्व कालव्यांवरील पाणी वापर संस्था तसेच वैयक्तिक लाभधारकांनी सिंचनाची पाणीपट्टी व थकबाकी शासनाच्या विहित पद्धतीने लवकरात लवकर जलसंपदा विभागाकडे जमा करून सहकार्य करावे, असे आवाहन शाखा अभियंता तथा शाखाधिकारी शुभम चौधरी यांनी केले आहे. रब्बी आवर्तन सुरळीत पार पडल्यास आगामी काळात उत्पादनात वाढ होऊन शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्नाला हातभार लागेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.