Kharif Season: जूनच्या दुसऱ्या आठवड्यात सलग तीन दिवस झालेल्या पावसानंतर पुढेही पाऊस पडेल, या आशेवर अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीनची पेरणी केली होती. मात्र, त्यानंतर पावसाने मोठा खंड दिल्याने उगवलेल्या पिकांचे अस्तित्व धोक्यात आले होते. अनेक शेतकऱ्यांनी तुषार सिंचनाद्वारे पिकांना पाणी देऊन ती जगविण्याचा प्रयत्न केला. दुसऱ्यांदा पाणी देण्याची वेळ येत असतानाच गेल्या दोन दिवसांपासून पावसाने पुन्हा हजेरी लावल्याने जोखीम घेऊन पेरणी केलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र, उर्वरित पेरण्या पूर्ण करण्यासाठी अजूनही दमदार पावसाची आवश्यकता असल्याचे चित्र आहे..दोन्ही जिल्ह्यांतील काही भागांत ७ ते ९ जूनदरम्यान झालेल्या पावसामुळे नद्या-नाल्यांना पाणी आले होते. मात्र, जमिनीत पेरणीसाठी आवश्यक तेवढी ओल निर्माण झाली नव्हती. तरीही पुढे चांगला पाऊस पडेल, या विश्वासावर अनेक शेतकऱ्यांनी विशेषतः सोयाबीनची पेरणी केली..Farmers Relief: अनेक ठिकाणी पाऊस हजर; गिरणाकाठच्या भागांना दिलासा.यानंतर तब्बल पंधरा दिवस पावसाने दडी मारल्याने उगवलेल्या पिकांवर संकट ओढवले. पिके करपण्याची भीती निर्माण झाल्याने काही शेतकऱ्यांनी तुषार सिंचनाच्या साहाय्याने पिकांना पाणी दिले. दुसऱ्या पाण्याची वेळ येत असतानाच मंगळवारी (ता. २३) सर्वदूर पावसाने हजेरी लावली. त्यानंतर बुधवारी (ता. २४) आणि गुरुवारी (ता. २५) काही भागांतही पाऊस झाला..हा पाऊस दमदार नसला, तरी उगवलेल्या पिकांना मोठे जीवदान मिळाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. मात्र, अद्यापही पेरणीयोग्य ओल जमिनीत निर्माण झालेली नसल्याने मोठ्या प्रमाणावरील पेरण्या रखडल्या आहेत..Farmers Relief: अहिल्यानगरमध्ये अतिवृष्टिबाधित गावांतील ४३७ विहिरींसाठी ६३ लाखांचा निधी.पावसामुळे वातावरणातील उकाडा कमी होऊन नागरिकांना दिलासा मिळाला असला, तरी खरीप पेरण्यांना होत असलेल्या विलंबामुळे शेतकरी चिंतेत आहेत. पहिल्या पावसानंतर मर्यादित क्षेत्रावरच पेरणी करणाऱ्या शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आता समाधान दिसत असले, तरी उर्वरित क्षेत्रावरील पेरण्यांसाठी त्यांनाही दमदार पावसाची प्रतीक्षा आहे..जून महिना संपत आला तरी जिल्ह्यात अद्याप समाधानकारक पाऊस झालेला नाही. आजपर्यंत केवळ ५१.७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून, पेरणीसाठी आवश्यक तेवढी ओल जमिनीत निर्माण झालेली नाही. किमान १०० मिलिमीटर पाऊस पडून जमिनीत सुमारे सहा इंचांपर्यंत ओल निर्माण होईपर्यंत शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये. अपुऱ्या पावसावर पेरणी केल्यास दुबार पेरणीचे संकट निर्माण होऊ शकते. त्यामुळे हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन आणि जमिनीत पुरेशी ओल झाल्यानंतरच पेरणी करावी.– राजेंद्र कदम, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, लातूर.पहिल्या पावसानंतर दोन एकर क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी केली होती. पिकांची उगवण चांगली झाली होती. पाऊस पडला नसता तर पिकांना पाणी द्यावे लागले असते. त्याची तयारीही केली होती. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे पिकांना मोठे जीवदान मिळाले आहे."– शिवहार शेटे, जायफळ, ता. कळंब, जि. धाराशिव.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.