Agriculture News : अमरावती ऑगस्ट महिन्यात सलग तीन ते चार आठवड्यांचा पावसाचा खंड पडल्याने जिल्ह्यात दुष्काळाचा पहिला ‘ट्रिगर’ लागू झाला आहे. त्यामुळे आता सुधारित वैज्ञानिक निकषांनुसार दुष्काळाच्या तीव्रतेचे मूल्यांकन करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. या प्रक्रियेत पिकांची प्रत्यक्ष स्थिती, पर्जन्यमानातील तूट, जमिनीतील ओलावा, भूजल पातळी आणि पेरणी क्षेत्रासह विविध प्रभावदर्शक निर्देशांकांचा आधार घेतला जाणार आहे..जिल्ह्यात १ जून ते ३१ ऑगस्ट या कालावधीत सरासरीच्या अवघ्या ५८.६० टक्के पावसाची नोंद झाली आहे. ऑगस्टमध्ये २५ पैकी १८ मंडलांमध्ये २० दिवसांपेक्षा अधिक काळ पाऊस झालेला नाही. अचलपूर, अंजनगावसुर्जी, भातकुली, चांदूर बाजार, चिखलदरा, धारणी, मोर्शी आणि वरूड या आठ तालुक्यांत सलग चार आठवड्यांपेक्षा अधिक काळ पावसाचा खंड नोंदविला गेला आहे. त्यामुळे सोयाबीन, कापूस आणि तूर या प्रमुख खरीप पिकांची अवस्था बिकट झाली आहे..Rohit Pawar Demands Drought Declaration: शेतीसमोर संकट अधिक गडद? तत्काळ दुष्काळ जाहीर करा, रोहित पवारांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी, १० मुद्दे केले उपस्थित.सुधारित वैज्ञानिक निकषांनुसार पहिला ‘ट्रिगर’ लागू झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात कृषी व उपग्रहाधारित प्रभावदर्शक निर्देशांकांचे मूल्यांकन केले जाईल. त्यानंतर तिसऱ्या टप्प्यात निवडक १० टक्के गावांमध्ये प्रत्यक्ष ‘ग्राउंड ट्रुथिंग’ करून पिकांच्या नुकसानीची पाहणी केली जाणार आहे. या पाहणीत ३३ टक्क्यांपेक्षा अधिक पीकनुकसान आढळल्यास मध्यम, तर ५० टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान असल्यास गंभीर दुष्काळाची स्थिती निश्चित केली जाईल..Maharashtra Drought Alert: दुष्काळाच्या उंबरठ्यावर महाराष्ट्र.पावसाअभावी सोयाबीन पिकाची फुलोरा आणि शेंगा भरण्याची अवस्था प्रभावित झाली आहे. पाण्याचा ताण कायम राहिल्यास सोयाबीनच्या उत्पादनात सुमारे ४० टक्क्यांपर्यंत घट होण्याचा प्राथमिक अंदाज आहे. कापूस व तुरीची वाढ खुंटली असून, जमिनीतील ओलावा कमी झाल्याने अन्नद्रव्यांचे शोषण आणि पिकांची वाढ मंदावली आहे..दुष्काळ जाहीर करण्यासाठी पर्जन्यमानातील तूट ही सरासरीच्या ५० टक्क्यांपेक्षा कमी असणे आणि सलग तीन ते चार आठवड्यांचा पावसाचा खंड असणे हे निकष महत्त्वाचे आहेत. त्यासोबत उपग्रह तंत्रज्ञानाच्या माध्यमातून वनस्पती निर्देशांक, मृदा आर्द्रता, भूजल पातळी आणि पेरणी क्षेत्राचे मूल्यांकन केले जाईल. त्यानंतर ॲप व जीपीएसच्या साहाय्याने निवडक गावांमध्ये प्रत्यक्ष पीकनुकसानीचे सर्वेक्षण केले जाईल. ३३ टक्क्यांपेक्षा अधिक पीकनुकसान आढळल्यास दुष्काळ जाहीर करण्याच्या प्रक्रियेला पुढील दिशा मिळणार आहे..दुष्काळ मूल्यांकनाचे टप्पेपहिला ‘ट्रिगर’ : सलग तीन ते चार आठवड्यांचा पावसाचा खंड.दुसरा टप्पा : कृषी व उपग्रहाधारित प्रभावदर्शक निर्देशांकांचे मूल्यांकन.तिसरा टप्पा : निवडक १० टक्के गावांत प्रत्यक्ष ‘ग्राउंड ट्रुथिंग’.३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान : मध्यम दुष्काळाची स्थिती.५० टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान : गंभीर दुष्काळाची स्थिती.महत्त्वाचे निकष : पर्जन्यमानातील तूट, मृदा आर्द्रता, भूजल पातळी, वनस्पती निर्देशांक आणि पेरणी क्षेत्र..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.