Sindhudurg News: सिंधुदुर्गनगरी जिल्ह्यातील कळणे सडा (ता.दोडामार्ग) येथील काजू बागेला मंगळवारी (ता.९) दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास आग लागली. या आगीत दोन शेतकऱ्यांची शेकडो काजू कलमे जळाली. काजुला आलेला मोहोर जळाल्याने यावर्षीचा हंगाम वाया गेला आहे. .कळणे येथील नामदेव देसाई आणि संजय देसाई या दोन शेतकऱ्यांची कळणे सडा परिसरात काजू बाग आहे. मंगळवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास या सडा परिसरात आग लागली. कडक ऊन, सुकलेले गवत आणि वारा यामुळे आगीचा भडका उडाला. अवघ्या काही मिनिटांत आगीने काजू बागांमध्ये प्रवेश केला. .Cashew Orchard Fire : आंबा आणि काजूची झाडे जळून खाक.आग लागल्याची माहिती समजताच शेतकरी आणि स्थानिक विझविण्यासाठी गेले. परंतु आगीने रौद्ररूप धारण केले होते.आग विझविण्यासाठी परिसरात कुठेही पाण्याचा स्रोत नसल्याने आग विझविताना ग्रामस्थांची चांगलीच दमछाक झाली..या आगीत दोनही शेतकऱ्यांची शेकडो झाडे जळाली.सध्या काजुला मोहोर फुटण्याची प्रकिया सुरू आहे. अशा स्थितीत काजूला आग लागल्याने यावर्षीचा हंगामच वाया गेला आहे.त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे..Cashew Orchard Fire : खांबाळे येथील आगीत काजूची २५० झाडे जळाली.आगरेषा काढण्याची गरजसिंधुदुर्ग जिल्ह्यातील पडीक जमिनीवर मोठ्या प्रमाणात गवत असते. हे गवत सुकण्यास आता सुरुवात झाली आहे. काही भागांत शेकडो एकर माळरानावर गवत आहे. त्यामुळे.डिसेंबर ते मे अखेरीपर्यंत जिल्ह्यात आगी लागण्याचे प्रकार घडतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी आंबा, काजू याशिवाय अन्य फळबागा असलेल्या ठिकाणी आगरेषा काढाव्यात असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.