Mumbai News: शेतीतील भांडवली गुंतवणुकीसाठी सुरू केलेल्या कृषी समृद्धी योजनेच्या निधी उपलब्धतेसाठी अखेर कृषी विभागाने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. याचा भाग म्हणून लेखाशीर्ष उघडले असून आगामी अधिवेशनात या योजनेसाठी निधी मागणी करण्यात येणार आहे. .राज्य सरकारने या वेळी पुनर्रचित पीकविमा योजना आणली आहे. त्यामुळे एक रुपयात पीक विम्यापोटीच्या रकमेत मोठी बचत झाली आहे. त्यामुळे वार्षिक पाच हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीची कृषी समृद्धी योजना पोकराच्या धर्तीवर राबविण्यात येणार आहे..Krushi Samruddhi Yojana : ‘कृषी समृद्धी’त ४८.९८ कोटी रुपयांचा लक्षांक.मात्र कृषी विभागाने या योजनेत जुन्या योजनांमधील अर्ज घुसडून योजनेचा बोजवारा उडविण्याची पूर्ण तयारी केली होती. मात्र कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी याबाबत आढावा बैठका घेऊन अधिवेशनाआधी या योजनेचा पूर्ण आराखडा तयार करण्याचे निर्देश दिले होते..Krushi Samruddhi Yojana: नुकसानग्रस्तांना ‘कृषी समृद्धी’तून लाभ.तसेच पावसाळी अधिवेशनात या योजनेसाठी निधी मागणीची गरज होती. मात्र योजनेचा आराखडा नसल्याने निधीच नव्हता. परिणामी ही योजना कशी राबविणार याबाबत साशंकता निर्माण झाली होती..दरम्यान, हिवाळी अधिवेशनात या योजनेसाठी निधी मागणीची तयारी सुरू झाली आहे. अद्याप यासाठी वित्त विभागाकडे प्रस्ताव पाठविला नसला तरी या आठवड्यात ही प्रक्रिया पूर्ण होण्याची शक्यता आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.