Chhatrapati Sambhajinagar News : पाचोडसह संपूर्ण परिसरात यंदा वेळेपूर्वीच उसाला तुरे फुटल्याने शिवार पांढरे झाले आहे. गळीत हंगामाला झालेला विलंब, ऊसतोड मजुरांची टंचाई आणि बदलत्या हवामानाचा हा परिणाम असून, यामुळे उसाच्या वजनात घट होण्याची भीती शेतकरी व्यक्त करत आहेत..२०१९-२० मध्ये जायकवाडी धरणातील पाणीटंचाईमुळे या पट्ट्यातील उसाचे क्षेत्र घटले होते. त्यावेळी संत एकनाथ कारखान्याचा हंगामही धोक्यात आला होता. मात्र, २०२१ पासून पावसाने सरासरी ओलांडल्याने उसाच्या क्षेत्रात मोठी वाढ झाली..Sugarcane Production Issue: उसाला तुरे आल्याने उत्पादनात घटीची भीती.सध्या पैठण तालुक्यातील १४ हजार ४६४ हेक्टरवर ऊस उभा आहे. परिसरातील संत एकनाथ आणि चौंढाळा येथील रेणुकादेवी सहकारी साखर कारखान्यांसह शेजारील जिल्ह्यांतील कारखानेही उसाची गरज पूर्ण करत आहेत. मात्र, तरीही मोठ्या प्रमाणात ऊस शिल्लक असल्याने आगामी काळात अतिरिक्त उसाचा प्रश्न गंभीर बनण्याची चिन्हे आहेत..Sugarcane Crushing Season: सोलापूर विभागात दीड कोटी मे.टन उसाचे गाळप.मजूरटंचाईचा फटकाहंगाम सुरू होऊन दोन महिने झाले तरी केवळ ३० टक्केच तोडणी पूर्ण झाली आहे. खराब रस्ते, वाहतुकीच्या समस्या आणि मजूरटंचाईमुळे तोडणीला उशीर होत आहे. जमिनीतील पाण्याचा निचरा न होणे आणि पोषक द्रव्यांची कमतरता यामुळे उसाला लवकर तुरा आला आहे..उसाला तुरा येणे हे पीक परिपक्व झाल्याचे लक्षण आहे. तुरा आल्यानंतर दोन महिन्यांपर्यंत वजनात फारशी घट होत नाही. मात्र, त्यानंतर ऊस पोकळ होऊ लागतो. सध्या गळीत हंगाम आणखी दोन-तीन महिने चालणार असल्याने, शेतकऱ्यांनी वेळेत तोडणीसाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.बाबासाहेब राऊत.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.