Pune News: विदर्भातील पवनार ते तळकोकणातील पत्रादेवीदरम्यान प्रस्तावित असलेल्या शक्तिपीठ महामार्गाविरोधात या प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांचा संताप सोमवारी (ता. २३) ठिकठिकाणी झालेल्या आंदोलनांतून पहायला मिळाला. निदर्शने, रास्ता रोको आणि घोषणांच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी या प्रकल्पास विरोध दर्शविला. .स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका संपल्यानंतर राज्य सरकारने या महामार्गासाठी जमीन मोजणीस सुरुवात केली होती. स्थानिक पातळीवर शेतकरी त्यास विरोध करत होते. त्यातच मागील आठवड्यात परभणी व लातूर येथे मोजणीसाठी बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांनी आंदोलकांना कथितरित्या मारहाण केल्याची घटना घडली.त्या पार्श्वभूमीवर, शेतकरी संघटनांनी राज्यभरात आंदोलनाची हाक दिली होती. त्यानुसार, ठिकठिकाणी हे आंदोलन झाले..Shaktipeeth Expressway: शक्तिपीठ महामार्गाविरोधात शेतकरी आक्रमक, राज्यात विविध ठिकाणी निदर्शने, रास्ता रोको.परभणीतही शेतकरी रस्त्यावरपरभणी- गंगाखेड राष्ट्रीय महामार्गावर सिंगणापूर फाटा (ता. परभणी) येथे विविध पक्ष संघटनांतर्फे आयोजित केलेल्या रास्ता रोको आंदोलनात मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले होते. यामुळे येथील वाहतूक पूर्णतः ठप्प झाली होती. यावेळी शिवसेनेचे (उबाठा) खासदार संजय जाधव यांनी ‘रत्नागिरी- नागपूर’ असा समांतर राष्ट्रीय महामार्ग अगोदरच अस्तित्वात असताना नव्या प्रकल्पाचा घाट कंत्राटदारांचे खिसे भरण्यासाठी घालण्यात येत असल्याचा आरोप केला..लातूर, धाराशिवमध्ये आंदोलकांचा उद्वेगलातूर ते कळंब रस्त्यावर ढोकी (ता. लातूर) येथे शक्तिपीठबाधित शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केले. यासोबत ढोकी येथे महामार्गाच्या जमीन मोजणीसाठी येणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना विरोध केला. विविध मागण्यांचे निवेदन त्यांनी यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना दिले. धाराशिव येथेही जिल्हाधिकाऱ्यांना अशाच आशयाचे निवेदन देण्यात आले..Shaktipeeth Expressway: शेतकऱ्यांच्या संसारावर वरवंटा फिरवणारा शक्तिपीठ महामार्ग होऊ देणार नाही- राजू शेट्टी.शेतकऱ्यांचा आक्रोशप्रस्तावित महामार्गामुळे परभणी, नांदेड, लातूर, सांगली, कोल्हापूरसह १२ जिल्ह्यांतील सुपीक शेती उध्वस्त होऊन हजारो शेतकरी देशोधडीला लागणार आहेत. कापूस, केळी, हळद, द्राक्षे अशी बागायती पिके जमीनदोस्त होतील. शेती गेली तर काय खायचे, आमचा उदरनिर्वाह कसा चालवायचा, अशा प्रश्नांची सरबत्ती करताना शेतकरी यावेळी दिसले..कोल्हापुरात मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणीमोजणीच्या नावाखाली शेतकरी महिला व वृद्धांवर झालेल्या अमानुष पोलिसी अत्याचारांतून सरकारची हुकूमशाही वृत्ती उघड झाली आहे. पोलिसांकडून झालेल्या अत्याचारामागे थेट गृहमंत्र्यांचे आदेश असल्याचे स्पष्ट होत असून, त्यामुळे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांची जाहीर माफी मागावी व नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अशी मागणी शक्तिपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीने केली. आंदोलनाचे नेतृत्व गिरीश फोंडे, उदय नारकर, विजय देवणे, प्रकाश पाटील, शिवाजी मगदूम सचिन चव्हाण आदींनी केले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.