Farmers Electricity Issue: लांबलेला पाऊस आणि वाढलेल्या उन्हामुळे पिके वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे. परंतु महावितरणकडून विजेच्या कमी दाबामुळे आणि अपुऱ्या वीजपुरवठ्यामुळे पिकांना पाणी देता येत नाही. विजेच्या लपंडावामुळे पेठ, पारगाव परिसरातील शेतकरी वर्ग त्रस्त झाला आहे.