Parbhani News: परभणी जिल्ह्यात शेतकऱ्यांनी गटाद्वारे एकत्र येऊन किमान १ हजार एकर क्षेत्रावर संत्रा, लिंबू, टँगो, द्राक्षे आदी फळपिकांची लागवड करावी. या फळांच्या विक्री व प्रक्रियेसाठी सहकार्य करू, अशी ग्वाही नाशिक जिल्ह्यातील मोहाडी येथील येथील सह्याद्री फार्मर प्रोड्यूसर कंपनीचे संस्थापकीय अध्यक्ष विलास शिंदे यांनी दिली..मानवत येथे सोमवारी (ता. १२) आयोजित संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या बैठकीत श्री. शिंदे बोलत होते. शेतकरी संघटना न्यासाचे कार्याध्यक्ष गोविंद जोशी, शेतकरी नेते लक्ष्मण वडले, शेतकरी संघटनेचे रामभाऊ शिंदे,.Group Farming: गटशेती ही काळाची गरज; शेतकऱ्यांनी एकत्र यावे.मदन महाराज शिंदे, सुधीर बिंदू, परभणी येथील कृषी विज्ञान केंद्राचे उद्यानविद्या विशेषज्ञ अमित तुपे, गुगळी धामणगाव (ता. सेलू) येथील द्राक्षे उत्पादक बालासाहेब डक, अर्जुन काळे, माणिकराव काळे, आबासाहेब जाधव, विठ्ठल शिंदे, माधव जाधव आदींसह जिल्ह्यातील शेतकरी उपस्थित होते..Group Farming: शेतकऱ्यांनी गट शेतीतून जास्त मूल्य असलेली पिके घ्यावीत, उत्पन्न वाढेल- पंतप्रधान मोदी.विलास शिंदे म्हणाले, ‘‘परभणी गोदावरी व दूधना या नद्यांच्या खोऱ्यातील जमिनीवर संत्रा, लिंबू या फळपिकांसह द्राक्षे लागवडसाठी योग्य वातावरण आहे. .विक्रीसाठी सोपेव्हावे यासाठी शेतकरी गटामार्फत फळपीकांची लागवड करणे फायदेशीर ठरते. द्राक्षाला भरपूर संधी आहेत.’’ या वेळी शिंदे यांनी संत्रा फळपीक व्यवस्थान, विक्री व्यवस्थापन, बाजार स्पर्धा यासह टॅंगो फळपीक लागवडीबाबत माहती दिली..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.