Latur News : जिल्ह्यात यंदा अतिवृष्टीने कहर माजवून शेतकऱ्यांची खरिपातील पिके नष्ट केली. यासोबत जमिनी व पशुधनाचे मोठे नुकसान झाले. शेतकऱ्यांची बिकट परिस्थिती झाली आहे. या परिस्थितीत पूर्वाश्रमीच्या समाजकल्याण व आताच्या सामाजिक न्याय विभागाने कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभीमान योजनेसाठी शेतकऱ्यांना शेतजमीन विक्री करण्याचे आवाहन केले आहे..योजनेसाठी गेली कित्येक वर्ष झाले जमिनी मिळत नसल्याची स्थिती आहे. यामुळे विभागाने ही योग्य वेळ समजून आवाहन केले, की विभागाची आवाहन करण्याची वेळ चुकली, याबाबत तर्क-वितर्क व्यक्त होत आहे. सध्याचा काळ शेतकऱ्यांना धीर देण्याचा असतानाच आपल्याच एका विभागाकडून होणाऱ्या या आवाहनावर टीका होत आहे..Farmer Issue: वेगवान वाऱ्यांची हवामान केंद्रांत नोंदच नाही.सामाजिक न्याय विभागाच्या वतीने दारिद्र्य रेषेखालील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील भूमिहीन कुटुंबांसाठी ही योजना राबवण्यात येते. योजनेत चार एकर जिरायती (कोरडवाहू) किंवा दोन एकर बागायती (ओलीताखालील) जमीन शंभर टक्के अनुदानावर वाटप करण्यात येते. त्यासाठी विभागाकडून इच्छुक शेतकऱ्यांकडून शासकीय बाजारभावाने जमिनी खरेदी करण्यात येतात. यात जिरायती जमिनीसाठी पाच लाख तर बागायती जमिनीसाठी आठ लाख रुपये एकरी मोबादला देण्यात येतो..गेली कित्येक वर्ष झाले या योजनेसाठी जमीन उपलब्ध होत नसल्याची स्थिती आहे. विभागाकडून जमिनी विक्रीचे आवाहन शेतकऱ्यांना करण्यात येते. मात्र, शेतकऱ्यांकडून प्रतिसाद मिळत नाही. जिल्ह्यात दोन महिन्यात अतिवृष्टी व पुरामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले. शेतकऱ्यांचे पशुधन वाहून केले तर जमिनी खरडून गेल्या. सरकारकडून मिळणारी मदत तोकडी असल्याने शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे. .उत्पादन खर्चापेक्षा किती तरी कमी पिकांचे उत्पादन निघाले असून त्यालाही बाजारात भाव नाही. अशा परिस्थितीत काही शेतकऱ्यांची शेतजमीन विक्री करण्याची मानसिकता तयार होऊ शकते, असा अंदाज बांधून की काय, परंतु विभागाने अचानक बुधवारी (ता. १५) शेतकऱ्यांना स्वाभीमान योजनेसाठी जमीन विक्रीचे आवाहन केले आहे. .Orange Farmer Issue: वरुडबाजार समितीच्या संमतीने होतेय संत्रा बागायतदारांची लूट .अतिवृष्टीने एकीकडे शेतकऱ्यांच्या पिकांची नासाडी सुरु असताना प्रशासनाने शक्तिपीठ महामार्गासाठी मोजणी प्रक्रिया सुरु ठेवली होती. आता समाजकल्याण विभागाच्या आवाहनामुळे संकटाच्या काळातही सरकार शेतकऱ्यांच्या जमिनीवर डोळा ठेऊन असल्याचे लपून राहिलेले नसल्याची टीका होत आहे..जमिनीच्या विक्रीसाठी अर्ज करालातूरचे सहायक आयुक्त समाजकल्याण यादवराव गायकवाड यांनी बुधवारी आवाहन करून किमान दोन एकर बागायती व चार एकर जिरायती जमीन असलेल्या शेतकऱ्यांनी जमीन विक्रीसाठी अर्ज करण्याची सूचना केली आहे. जमिनी विक्रीसाठी जमिनीची कमाल मर्यादा नाही. विशेष म्हणजे अर्ज दाखल करण्यासाठी अन्य योजनांप्रमाणे शेतकऱ्यांना मुदतीचे बंधन घालण्यात आलेले नाही. .जमीन एकापेक्षा अधिक व्यक्तींच्या नावे असल्यास त्या सर्व व्यक्तींची संमती व स्वाक्षरी अर्जावर असणे आवश्यक आहे. खरेदीपूर्वी मोजणी करूनच जमीन खरेदीचा निर्णय घेण्यात येईल. योजनेत जमिनीच्या लाभासाठी लाभार्थ्यास अर्ज करण्याची आवश्यकता नाही. ज्या गावात जमीन उपलब्ध झालेली आहे, त्या गावातील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील दारिद्र्य रेषेखालील भूमिहीन शेतमजुरांची यादी मागवून लाभार्थ्यांची निवड करण्यात येणार असल्याचे गायकवाड यांनी आवाहन करताना म्हटले आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.