Beed Agriculture Movement: रासायनिक खतांच्या वाढत्या खर्चामुळे शेती तोट्यात जात असताना बीड कृषी विभागाने आता ‘बॅक टू बेसिक्स’चा नारा दिला आहे. ‘विषमुक्त शेतीकडे वळा आणि सेंद्रिय शेतीची कास धरा’ या उद्देशाने बीड तालुक्यातील बोरखेड येथे दशपर्णी अर्क तयार करण्याचे प्रात्यक्षिक कृषी विभागाच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आले..रासायनिक खते आणि महागड्या कीटकनाशकांच्या विळख्यातून शेतकऱ्यांची मुक्तता करण्यासाठी कृषी विभागाने पुढाकार घेतला आहे. खरीप हंगामाच्या पूर्वतयारीच्या पार्श्वभूमीवर सेंद्रिय शेती ही केवळ चर्चेपुरती मर्यादित न राहता ती एक चळवळ बनावी, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. यशोदीप शेतकरी गटाच्या शेतावर प्रत्यक्ष दशपर्णी अर्क तयार करून शेतकऱ्यांनी विषमुक्त शेतीचा संकल्प केला..Dashaparni Extract : शेतकरी गटाकडुन दशपर्णी अर्क निर्मितीचा प्रयोग .जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुभाष साळवे, उपसंचालक दादाराव जाधवर, प्रकल्प उपसंचालक सूरज पाटील आणि उपविभागीय कृषी अधिकारी उद्धव गर्जे यांच्या मार्गदर्शनाखाली बीड तालुक्यात गावागावांत जनजागृती मोहिमा राबविण्यात येत आहेत. तालुका कृषी अधिकारी अशोक साळी व मंडळ कृषी अधिकारी सतीश मिटकरी यांच्या नियोजनामुळे या मोहिमा थेट शेताच्या बांधापर्यंत पोहोचल्या आहेत. सहायक कृषी अधिकारी जालिंदर आगलावे यांच्या संकल्पनेतून प्रगतिशील शेतकरी रामचंद्र शिंदे यांच्या शेतात हे प्रात्यक्षिक पार पडले..‘आत्मा’चे अशोक काळे यांनी सेंद्रिय शेतीचे महत्त्व विशद केले, तर उपकृषी अधिकारी राजेंद्र राऊत यांनी घरच्या घरी दशपर्णी अर्क तयार करण्याची पद्धत, त्याचे फायदे आणि वापराचे तंत्र शेतकऱ्यांना प्रत्यक्ष दाखवून दिले. विशेष म्हणजे, यासाठी लागणारे साहित्य शेतकरी गटातील सदस्यांनी श्रमदानातून उपलब्ध करून दिले होते. या उपक्रमामुळे शेतकरी खर्चात बचत आणि उत्पादनवाढ या दिशेने सकारात्मकपणे वाटचाल करत असल्याचे दिसून आले..Nimboli Ark: निंबोळी अर्क घरच्या घरी कसा तयार करायचा? निंबोळी अर्काचे फायदे काय ?.“दशपर्णी अर्क प्रात्यक्षिकासारखे उपक्रम प्रत्येक गावात राबविण्याचे आमचे नियोजन आहे. शेतकऱ्यांनी घरच्या घरी बीज प्रक्रिया आणि जैविक औषधनिर्मितीवर भर दिल्यास येणारा खरीप हंगाम अधिक फायदेशीर ठरेल. कृषी विभाग केवळ कार्यालयापुरता मर्यादित न राहता थेट बांधावर जाऊन शेतकऱ्यांना तांत्रिक मार्गदर्शन करत राहील,” असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुभाष साळवे यांनी सांगितले..खरिपासाठी बीज प्रक्रिया आणि बीबीएफचा कानमंत्रकेवळ सेंद्रिय शेतीच नव्हे, तर पेरणीपूर्वी बियाण्यांची उगवण क्षमता तपासणे किती महत्त्वाचे आहे, हे सहायक कृषी अधिकारी जालिंदर आगलावे यांनी शेतकऱ्यांना पटवून दिले. तसेच उत्पादनवाढीसाठी बीबीएफ आणि डिबलरद्वारे पेरणी तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे मार्गदर्शनही करण्यात आले. सहायक कृषी अधिकारी सचिन भालशंकर यांनी आभार मानले. या वेळी पाणी फाउंडेशनचे शेख साहेब यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.