Pune News: राज्यातील अनेक सोयाबीन खरेदी केंद्रांवर हमाली, कडता, चाळण आणि एफएक्यू दर्जात माल बसविण्याच्या नावाखाली शेतकऱ्यांकडून पैशांची वसुली सुरू आहे. शेतकरी त्याविषयी तक्रार करत आहेत. खरेदी केंद्र मिळवण्यासाठी संस्थांना एक ते पाच लाख रुपयांपर्यंत आर्थिक व्यवहार करावे लागले. आता या संस्था शेतकऱ्यांकडून वसुली करत आहेत, असे सूत्रांनी सांगितले..खुल्या बाजारात सोयाबीनचे दर हमीभावापेक्षा सुमारे एक हजार ते १३०० रुपयांनी कमी आहेत. त्यामुळे शेतकरी हमीभावाने सोयाबीन खरेदीची वाट पाहत आहेत. त्यातच यंदा राज्य सरकारने घातलेल्या गोंधळामुळे खरेदीला उशीर होत आहे. सोयाबीन हातात येऊन अडीच महिने झाले झाले तरी खरेदीला वेग आलेला नाही. यात शेतकऱ्यांची कोंडी होत आहे. सोयाबीनची खरेदी करताना शेतकऱ्यांकडून एक रुपयाही घेऊ नये, असा नियम आहे..Grape Farmers Issue: ...तर दक्षिण आफ्रिकेत स्थलांतर करू.खरेदी केंद्रांना सरकारकडून क्विंटलला ५५ रुपये दिले जातात. पण सध्या केंद्रांवर शेतकऱ्यांकडून वेगवेगळ्या कारणांखाली वसुली केली जात आहे. खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांकडून हमालीसाठी क्विंटलमागे १०० ते १५० रुपये घेतले जात आहेत. तसेच माल खरेदीयोग्य आहे, हे ठरविण्यासाठी ग्रेडरलाही पैसे द्यावे लागत आहेत. त्यासाठी एक ते पाच हजारांपर्यंत वसुली केली जात आहे. तसेच काही भागात क्विंटलमागे एक ते दीड किलोचा कडताही घेतला जात आहे, असे काही शेतकऱ्यांनी सांगितले..मंत्रालयापासून सुरुवातशेतकऱ्यांकडून केल्या जाणाऱ्या वसुलीसंदर्भात काही केंद्र चालकांशी संपर्क साधला असता धक्कादायक माहिती पुढे आली. “खरेदी केंद्र मंजूर करण्यासाठी आमच्याकडून दोन ते तीन लाख रुपये घेतले. आता हे पैसे आम्ही घरून थोडेच देणार आहे? याची वसुली आम्हाला शेतकऱ्यांकडूनच करावी लागणार आहे,” अशा शब्दांत अनेक केंद्र चालकांनी वसुलीच्या प्रकारांना दुजोरा दिला. सोयाबीन खरेदीसाठी वसुलीची सुरुवात मंत्रालय पातळीवर झाली आणि त्याची झळ आता शेतकऱ्यांना बसत असल्याचे त्यांनी सांगितले..Maharashtra Assembly: सोयाबीन खरेदी केंद्रांवर शेतकऱ्यांची लूट; वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल .वसुलीसाठी मोकळीक?सोयाबीन खरेदी केंद्रांसाठी मंत्रालय पातळीवर आर्थिक व्यवहार सुरू झाले तेव्हा मराठवाडा आणि विदर्भात गावागावांमध्ये शेतकऱ्यांकडून सात-बारा उतारे गोळा करण्याचे काम सुरु झाले होते. उताऱ्यावर सोयाबीनची नोंद आहे पण हमीभावाने सोयाबीन विकणार नाहीत तसेच खरेदी मर्यादेपेक्षा कमी सोयाबीन विकलेल्या शेतकऱ्यांचे सात-बारा उतारे मोठ्या प्रमाणावर गोळा करण्यात आले आहेत. आता या सात-बारा उताऱ्यांवर शेतकऱ्यांच्या नावावर खुल्या बाजारात कमी भावाने खरेदी केलेले सोयाबीन हमीभावाने टाकले जाणार आहेत. हा प्रकार रोजरोसपण सुरु आहे. त्यामुळे केंद्र चालकांनी केलेले आर्थिक व्यवहार भरून काढण्यासाठी एक प्रकारे मोकळीक मिळाल्याची चर्चा सध्या सुरू आहे..उद्दिष्टाच्या ५ टक्केच खरेदीराज्यात यंदा १८ लाख ५० हजार टन सोयाबीन खरेदीचे उद्दीष्ट देण्यात आलेले आहे. पण ११ डिसेंबरपर्यंत केवळ ९५ हजार टनांचीच खरेदी झाली आहे. म्हणजेच उद्दिष्टाच्या केवळ ५ टक्केच खरेदी झाली आहे. केवळ ४१ हजार ५५४ शेतकऱ्यांकडून सोयाबीन खरेदी करण्यात आले. खरेदीची वाट पाहून अनेक शेतकऱ्यांनी खुल्या बाजारात सोयाबीन विकले आहे. खरेदीतील गोंधळ कायम असल्याने शेतकऱ्यांची कोंडी झाली आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.