Sangli News: भाले कडा-पेड (ता. तासगाव) येथील उपकेंद्रातून परिसरातील गावांना वीजपुरवठा केला जातो. सध्या विहिरींमध्ये पुरेसे पाणी असल्याने शेतकऱ्यांची रब्बी पिकांवर मोठी भिस्त आहे. .मात्र ‘महावितरण’कडून सातत्याने कमी दाबाने वीज देण्यात येत असल्याने शेतकऱ्यांचे पंप जळण्याचे, बिघडण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. आधीच कर्जाच्या फेऱ्यात अडकलेल्या शेतकऱ्यांना पंपदुरुस्तीचा अतिरिक्त खर्च करावा लागत असल्याने ते दुहेरी संकटात सापडले आहेत..Power Supply Cut: नाशिक, जळगाव, आणि अहिल्यानगरमध्ये शेतीचा वीजपुरवठा खंडित; शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ.विजेचा दाब अत्यंत कमी असल्याने रात्री जागून पाणी देणाऱ्या शेतकऱ्यांना पिकांना पाणी देता येत नाही. पंप अर्ध्या वाटेत बंद पडतो, तर काही ठिकाणी पंप व स्टार्टर जळून जात आहेत. त्यामुळे गहू, मका, ऊस व भाजीपाला पिकांवर ताण येण्याची वेळ आली आहे. .Power Supply Issue : कृषिपंपांचा वीजपुरवठा विस्कळीत.पेड, धोंडेवाडी, नरसिंगपूर, लिंबगाव, विजयनगर, कापूरगाव, मोराळे या गावांतील शेतकरी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेती करतात. भरपूर पावसामुळे पाणी पातळी वाढली असली, तरी वीजपुरवठ्याच्या कमतरतेमुळे रब्बी हंगाम धोक्यात आला आहे. ‘महावितरण शेतकऱ्यांवर अन्याय करत आहे,’.अशी भावना शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे. ‘महावितरण’च्या कमी दाबाच्या विजेमुळे पंप जळणे, केबल जळणे, स्टार्टर निकामी होणे, हे प्रकार सतत घडत असल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान वाढले आहे. शेतकऱ्यांनी योग्य दाबाचा, अखंडित वीजपुरवठा तातडीने सुरू करावा, अशी मागणी केली आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.