Jalgaon News: कांद्यांना सध्या बाजारात भाव नसल्याने येथील शेतकरी भावंडांनी सुमारे तीन हेक्टर क्षेत्रावरील काढणीवर आलेल्या उभ्या कांद्यावर ‘रोटाव्हेटर’ फिरवून पीक नष्ट केले. उत्पादनावर झालेला खर्च देखील हाती येत नसल्याने हा कठोर निर्णय घेतल्याचे शेतकऱ्याने सांगितले. दरम्यान, ही परिस्थिती लक्षात घेता शासनाने कांद्यांना हमी भाव द्यावा, अशी मागणी होत आहे. .येथील नंदलाल माळी व चंद्रकांत माळी यांची वटार रस्त्यावरील शिवारात शेती आहे. या भावडांनी मोठ्या कष्टाने कांदा पिकाची लागवड केली होती. जिल्ह्यात कांदा लागवडीसाठी नेहमीच अग्रेसर असलेल्या अडावद परिसरात दरवर्षी मोठ्या प्रमाणावर कांद्यांची लागवड केली जाते..Onion Crisis: पावसामुळे पीक येण्याची शक्यता नसल्याने कांद्यावर फिरवला रोटाव्हेटर.यंदाही सुमारे १ हजार २०० ते १ हजार ५०० हेक्टरावर कांद्याची लागवड करण्यात आल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. साधारणतः ऑगस्ट, सप्टेंबर दरम्यान परिसरात पावसाळी लाल कांदा घेतला जातो..Soybean Crop Loss: हिंगोलीत शेतकऱ्याने उभ्या सोयाबीनवर रोटाव्हेटर फिरवला; पिकांवर कीड व पावसाचा दुहेरी फटका.माळी भावडांनी देखील कांदा लागवड केल्यानंतर त्याची सुरवातीपासून काळजी घेतली. सद्यःस्थितीत कांदा काढणीवर आलेला असताना अपेक्षित भाव मिळेल, अशी त्यांना आशा होती..मात्र, परिसरात सध्या कांद्यांना प्रती मण (४० किलोसाठी) अवघा २५० ते ३०० रुपयांचा भाव मिळत आहे. सहा, सात रुपये किलोचा दर हाती येत असल्याने यात उत्पादन खर्चही निघणे कठीण आहे. त्यामुळे हताश झालेल्या माळी बंधूंनी आपल्या शेतातील उभ्या कांद्यावर ‘रोटाव्हेटर’ यंत्र फिरवले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.